Sunday, December 21, 2014

संवाद

आपण 'कुणीच नाही' या कॅटेगरीत मोडत असताना कलाकृतींच्या सानिध्यात गेलो तर घडणारी बातचीत भन्नाट असते … कुठलाच आविर्भाव नाही… अगदी 'काहीच कळत नाही हं ' आणि 'यातील कशाचाही अजिबात गंध नाही ',  हे हि जेव्हा आडवं येत नाही तेव्हाचा संवाद … तुम्ही बसता त्या कलाकृतीसमोर फतकल मारून…  कान न्युट्रल…  डोळे न्युट्रल आणि मनही न्युट्रल… फक्त कवाडं तेवढी उघडी… अगदी सताड… ऊन, वाऱ्याबरोबरच धूळीसाठीही वेलकमची पाटी घेऊन…  

मग कधी अवचित येते
तरळत गाण्यातील तान
लाटेवर वाहत सागराचे उधाण
चित्रातले रंग
उतरतात मनात  
शिल्प हि सांगते काही
हळुवार कानात

###

खुर्च्यांची रास… खुर्चीची आस… खुर्चीशी संभोग आणि मग त्या खुर्चीचेच भोग… खुर्च्यांचे विविध आकार… खुर्चीचे बहुविध विकार… खुर्च्यांचा आगळाच बाज… खुर्चीच ताज… तीच सरताज… खुर्च्यांसाठी साधना आणि त्यासाठी तिचीच आराधना… मोठ्या खुर्चीपुढे छोटी खुर्ची… मोठ्या खुर्चीची मिजास मोठी… छोट्या खुर्चीची अदब खोटी… मागे बांधलेल्या हातात कट्यार छोटी… आधाराची खुर्ची… वर नेणारी खुर्ची… छोट्या खुर्चीला स्वतःत सामावून घेणारी खुर्ची…गुलाबी, गुबगुबीत बाळ खुर्चीला मांडीत जोजवणारी भारदस्त पण मोडकळीस आलेली वृद्ध खुर्ची… खुर्च्यांना लगटलेल्या मनुष्याकृती गबाळ… बिभत्स… रंगात बरबटलेल्या… किळसवाण्या… शिसारी आणणाऱ्या… आणि खुर्ची मिळाल्यावर बेसावध खुर्चीच्या अधीन झालेल्या… खुर्चीतून लोंबणारे पाय त्या असूरी खुर्चीनं हातात घट्ट आवळून धरलेले… कधीही खेचून घेतले तर बसलेला सपशेल तोंडघशी पडणार हे निश्चित…
जिला आधारासाठी निर्मिले तिच्याच सत्तेत रुपांतरणाचा हा चित्र प्रवास. नाव Man and a chair आहे खरे. पण इथे दिसते ती a chair ची THE Chair होण्याची चित्तरकथा. सत्ता आणि मनुष्य यांची विविध रूपे…
कुठे?
Chandramohan Kulkarni यांच्या डिजिटल चित्र प्रदर्शनात.


Beauty and obnoxiousness...

एखादे झाड कुरूप आहे म्हणून बाजूच्या तळ्यात न्हाऊन, पानांना विंचरून, फाद्यांमध्ये भांग बिंग काढून, शेजारच्या वेलीवरच्या खुडलेल्या कळ्यांचा गजरा बिजरा माळून नाही मिरवत… मग माणूस का करतो असं? स्वच्छ आणि स्वस्थ राहाणं वेगळं… पण सुंदर दिसण्यासाठीचा अट्टाहास? शरीराला विशिष्ट आकार देण्याचा अट्टाहास… हात, पाय, पोट 'देखणं' करण्याचा अट्टाहास… तंग कपड्यात अतरंगी शरीर कोंबण्याचा अट्टाहास… शरीराचा रंग बदलण्याचा अट्टाहास… काळ्याचा तिरस्कार… पांढरेफट्ट होण्याची जीवघेणी लालसा… आणि यात वास्तवाकडे डोळेझाक… पापण्या कोरून घेणे… हातापायावरची लव काढून टाकणे… चेहऱ्याला ब्लिच लावणे… सगळं आग आग करणारे… डोळ्यावर दोन काकडीचे स्लाईस ठेवून घेतले की सुंदर होण्याच्या अट्टाहासासाठीची आणि वास्तवापासून पळून जाण्यासाठीची सगळी जळजळ क्षणभर शांत झाल्याचा आभास निर्माण करणे… या सगळ्याची कीव करावी की  त्याकडे दुर्लक्ष करावे? की हे या घडीचे वास्तव आहे, म्हणून त्याचा स्वीकार करावा? आपणही दोन काकड्यांचे स्लाईस डोळ्यावर ठेवून घ्यावेत की काय?

संदर्भ: Gym Gym आणि Beauty Parlor चित्रमालिका by Chandramohan Kulkarni

###

From minimal to abundance

"You see, I really have wanted to make it so that people get the idea that these folk, who are eating their potatoes by the light of their little lamp, have tilled the earth themselves with these hands they are putting in the dish, and so it speaks of manual labor and — that they have thus honestly earned their food. I wanted it to give the idea of a wholly different way of life from ours — civilized people. So I certainly don’t want everyone just to admire it or approve of it without knowing why." - Vincent Van Gogh on The Potato Eater. 

मातीत घाम गाळून दिवसभराच्या श्रमानंतर पिकवलेल्या अन्नाची चव चाखायला डायनिंग टेबल भोवती बसलेले शेतकऱ्याचे कुटुंब आपल्या चित्रात उतरवताना विन्सेंट वँन गॉगला श्रमाचे महत्व विशद करायचे होते. त्याच्या सुसंस्कृत, उच्चभ्रू समाजाहून वेगळं असं हे शेतकऱ्याचे कुटुंब म्हणूनच आपले अन्न हाताने ग्रहण करत. 
पण आता काळ आणि परिस्थिती बदलली आहे. त्या मोजक्या, जेमतेम, minimalचा परिघ अवास्तव वाढला आहे. त्या तथाकथित सुसंस्कृत, उच्चभ्रू समाजाने या कष्टकरी समाजाला एक विचित्र न्युनगंडाच्या परिघात ढकलून दिलं आहे. श्रमाच्या महत्वापेक्षाही श्रमाच्या मोबदल्याचा अट्टाहास आणि त्या मोबदल्याचा उपभोग उच्चभ्रू समाजाप्रमाणेच घेण्याचा अट्टाहास. वँन गॉगला श्रद्धांजली वाहण्यासाठी त्याच्या The Potato Eatersची चंद्रमोहन कुलकर्णी यांनी काढलेली चित्राकृती हा अट्टाहास अत्यंत प्रभावी पद्धतीने मांडते. Minimal to abundance, Potato to french fries, थोडक्यात श्रमाचे समाधान ते सततच्या उपभोगतील अपूर्णता, असंतुष्टी, असमाधान, असा काहीसा हा प्रवास आहे. 
अन्न हातात नाही तर काटेरी चमच्यांनी ताब्यात घेतले आहे, वँन गॉगच्या टोप्या घातलेल्या नायिका आता बोडक्या डोक्यांनी, तंग, आधुनिक तोकड्या कपड्यात बसल्या आहेत. त्यांची झुकलेली नजर आता रोखली गेलेली आहे. कोपऱ्यातील टेबलवरची चहाची केटली आता अप्रासंगिक आहे कारण हातात बियरचा मग आलाय. भिंतीवरच्या घड्याळाचा आकार, रुप बदललं आहे. मूळ चित्रातील टेबलवर मध्यभागी मिणमिणताच पण प्रकाश सांडवणाऱ्या दिव्याच्या जागी आता विजेचा दिवा आला आहे. आणि इथेच या minimal to abundanceच्या प्रवासातील कुलकर्णीनी टिपलेला उपरोध अंगावर येतो. अपुऱ्या प्रकाशातही उजळून निघालेले चेहरे आता भरपूर उजेडाची सोय असतानाही अंधार लपेटण्याला उत्सुक आहेत.
पुन्हा तीच कदाचित वास्तवाकडे कानाडोळा करण्याची उर्मी… स्वतःच्या तोकड्या प्रवृत्तींचे, प्रकृतीचे नागवेपण लपवून ठेवण्याची धडपड… दोन काकड्यांच्या चकत्यानी डोळे मिटून घेणे…

वर्षा वेलणकर  

Tuesday, December 16, 2014


क्या नाम हैं तुम्हारा?
किस मीट्टी के बने हो तुम?
क्या ज़ात हैं तुम्हारी?
ऐसी क्योंन सी मज़हब के बाशिंदे हो
जो हमनस्ल को हलाक करने का हुक्म देती हैं?
किस उपरवाले के सामने
इबादत के लिए सर झुकाते हो?
आँखे मूँद कर, हाथ फैला कर क्या दुआ माँगते हो?
क्या उसकी सूरत का कोई जर्रा 
नजर नहीं आया तुम्हे उस नन्ही जान की आँखों में?
उसका नूर क्या उस मासूम चेहरे पर नहीं था
जिसे तुमने अपनी बंदूक की नोक पर धरा था?
क्या कोई भी रिश्ता नहीं था तुम्हारा उससे
जिसे आज तुमने तार तार कर दिया?
कैसा खून दौड़ रहा है तुम्हारी रगों में
जो उस ख़ौफ़ज़दा, थरथराते जिस्म के 
अंदर दौड़ते खून से जुदा हैं?
ये किस मकसद की लड़ाई लड़ रहे हो तुम?
क्या बात रखनी हैं तुम्हें सबके आगे?
क्या मनवाना चाहते हो दुनियासे?
किस चीज़ का बदला लेना चाहते हो?

अब बस घिन आती हैं तुमसे

वर्षा

Sunday, October 26, 2014

चलो, आज एक सपना बो दे


चलो, आज एक सपना बो दे
मिट्टी के ढेरों परतोंके नीचे
जो महीन, काली, गीली सी
हाथों को जो थाम लेती हैं
उस मिट्टी के हवाले कर दे
तेरे मेरे एक नन्हें अरमान का बिज
चलो आज एक सपना बो दे
अरमान जो मन में मेरे जागा था
तेरी ख्वाहिशोंके साथ भागा था
हमारी खुली खुली आँखों में
जब आकर बसा था वह
चलो, आज वही सपना बो दे
आंखोकी बारिशों से जतन करे
कभी छाव, कभी धुप उसपर धरे
जब करवट बदलेगा, साँस लेगा
सपना हमारा हमें आवाज देगा
तब हम थामेंगे दामन उसका
और फिर नए सिरेसे करेंगे
एक नए सफ़र का आगाज
एक कोरी करारी मंजिल की ओर
चल देंगे हम...
चलो, आज यही एक सपना बो दे
वर्षा वेलणकर

Wednesday, October 15, 2014

उम्मीद 



रंगबिरंगे कागजोंके टुकड़ो को
जोड़-जोड़ कर मैंने कुछ 
फुल, गुलदस्ते और तितलियाँ बनायीं हैं 
जानती हूँ तुम हँस के कहोंगे,
बेजान है ये सारे; वक्त की बर्बादी!


तो फिर जरा याद करों और बताओ,
गीली रेत के बड़े बड़े टीले बनाकर
और दोनों ओर से कुरेदकर
जब हात मिलाते थे टिलोंके अंदर
कस के पकड़ते थे, वों क्या था?


बड़ो ने जिसे बेमानी करार दिया था
उन सपनोंको खरीदनेके लिए
गुल्लक में चव्वन्नि-अठ्ठनीया 
जमा की थी, वो क्या था?


उम्मीदेही तो थी वो सारी
कभी साथ न छोड़ने की;
सपनों को अपनाने की


उसी उम्मीद से आज 
इन कागजोंकी तितलियोंको
और उन ढेर सारे फुलोंको
रंगों से सजानेका मन हैं
शायद...
उन्हीसे मेरे आंगन में बहार आ जाए!


वर्षा वेलणकर

Sunday, October 12, 2014

यादें

यादें 

अब कोई याद किसी जिस्म से लिपट के नहीं आती 
अब कोई याद किसी नाम या पते की मोहताज नहीं 

यादों के वह क़िस्से, उनके जनम की वह कहानियाँ  
अब वो क़िरदार उनके शहरोंकी गलियोंसे नदारद है 

अब जिस्मोंसे आज़ाद होकर यादें बग़ल में बैठती है 
एहसासोंकी ख़ुश्बू से सराबोर साँसों में उतरती है याँदे 

बचपन की मासूमियत और प्यार का इज़हार है यादें 
दोस्ती, दग़ा, दुख, कभी दिल को मिला क़रार है यादें  

अब कोई याद किसी ज़िस्म से लिपट के नहीं आती 
अब कहानियों से मिली एक सिख बन गई है यादें 

वर्षा वेलणकर 



इबादत

इबादत 

जुनू जहा में ज़र-जमीं का 
मुझे तो बस तेरे नाम का 
शान, शौक़त और शोहरत 
कुछ भी नहीं है काम का 

तेरी पनाह ही चाह में 
भटक रहे सब दरबदर 
जान, जिस्म, वज़ूद तू ही 
बंदा तो है बस नाम का 

साँसों की गर्मी तेरी नेमत 
अश्कों की बारिश तू ही तू 
ज़ानो पे तेरे रख के सर ये 
एक पल तो दे आराम का?

वर्षा वेलणकर 

Friday, July 25, 2014

रूह 

आपकी नज्म ने उठाया एक सवाल
क्या रूह देखी है कभी?
रूह को महसूस किया है? (गुलज़ार)

किसीने बिना स्याही के कलमसे 
कोशिश की थी कुछ लिखनेकी 
पाक कोरे कागज़ पर 
कुछ अल्फ़ाज़ उभरके आये थे 
कागज़ के पिछे की ओर 
बंद आँखों से मैं 
उँगलियाँ घुमाती रही 
पूछती रहीं के,
क्या रूह महसूस हुई कहीं?

हवाओं ने रुख बदला 
कागज़ हवाओंके हवाले 
फिर वहीं दौड़; वो भागमभाग 
आँधी थमी तो कागज फिर हाथ आया 
फिर वहीं सवाल 
क्या रूह देखी है कभी?
रूह को महसूस किया है?

अब जो हाथ आया है कागज 
उंगलियाँ फेर रही हूँ उन अल्फाजोपर 
इस बार उनकी गहराई को छू रही है उंगलियाँ 
जो लिखा है बड़ा जोर देकर 
वही दिखा है उंगलियोंको 

रूह देखी तो नहीं है 
पर रूह को महसूस किया है! 

वर्षा वेलणकर 

दोन लोक जगत असतात आपल्यात. एक जो फक्त आपल्या घरापुरता विचार करतो आणि एक जो फक्त आपला विचार करतो. तुम्हाला हा सिक्वेन्स चुकला असे वाटेल. पण नाही, तसाच आहे. बरोबर. जन्माला आल्यावर ज्या लोकांमध्ये तो वावरतो तो आधी त्या लोकांचा विचार करतो. ते काय बोलतात, ते कसे वागतात, त्यांना काय वाटतं आणि त्यातही माझ्याबद्दल काय वाटतं हा विचारांच्या priority चा सिक्वेन्स असतो. आधी प्रतिक्रिया येताना दिसते. इतर जे करतात त्यावर प्रतिक्रिया. पण ती का आणि कशी येते याचा विचार त्या फक्त आपला विचार करणाऱ्या व्यक्तीला करण्याची इच्छा होणे हे गरजेचं असतानाही तो तसा विचार करताना कुणी आढळून येत नाही. असं का होत असावं? 
माझ्या अस्तित्वाच्या केंद्रस्थानी मी स्वतः आहे आणि मग इतर सारं काही, हे सत्य खरंच समजायला कठीण आहे का? आणि मी जर केंद्रस्थानी आहे तर आधी मला स्वतःला तपासून, वेगवेगळ्या कसोट्यांवर पारखून, अनुभवाच्या भट्टीतून तावून सुलाखून मग व्यक्त व्हायला हवे, हे काम खरंच खूप कठीण आहे? साधं समीकरण आहे - इतरांच्या कृतीवर जर माझ्यातून प्रतिक्रिया उमटत असेल तर मग माझ्याही कृतीची परिणीती अशीच असणार ना? म्हणजे संतापून बोलले तर इतरही उत्तरादाखल संताप व्यक्त करतील, बरोबर? मग आनंद आणि समाधान व्यक्त करत गेले तर परतावाही आनंद आणि समाधानाचा असेल, नाही का? 
आपल्या आत जगणाऱ्या दोन व्यक्तींच्या उभे राहण्याचा सिक्वेन्स बदलायला हवा. आधी माझा विचार म्हणजे स्वार्थी असणं नाही तर तेच सगळ्यात महत्वाचे आहे. जे इतरांकडून अपेक्षित आहे ते मिळवायचे असेल - या इतरांमध्ये समाज म्हणायचे आहे मला - तर आपल्याला आधी त्या सर्व अपेक्षांची पूर्तता स्वतःसाठी करावी लागेल. समाजाचा घटक म्हणून जर मला काही समाजाकडून हवं असेल तर आधी ते समाजाला देण्याची ताकद आणि कुवत मी माझ्यात निर्माण करायला हवी. मला कुणी समजून घेत नाही, माझी कदर करत नाही अशा तक्रारी करतानाची नकारात्मकता जर माझ्यात निर्माण होत असेल तर ती नकारात्मकता मी समाजाच्या ओंजळीत टाकते. त्याऐवजी, कुठल्याही अभिनिवेशाशिवाय, मी समाजाला ओळखते, त्याच्या चुकांची आणि चांगलेपणाची मला जाण आहे आणि ज्याचा मी ही एक घटक आहे त्या समाजाची ताकद आणि कुवत माझ्या ताकदीवर आणि कुवतीवर अवलंबून आहे हे ज्यादिवशी प्रत्येकाच्या मनात लख्ख उमगेल - उमलेल त्यादिवशी आपल्या आत जगणाऱ्या दोन व्यक्तींमध्ये कुठलेही मतभेद, गैरसमज आणि गैरवर्तणूकीला स्थान राहणार नाही. 
त्या आतल्या दोन लोकांच्या जगण्याच्या priority बदलण्याची गरज आहे. आणि मुख्य म्हणजे सजग होऊन जगण्याची गरज आहे. जाणीवा sharpen करण्याची गरज आहे. समरसून जगण्याची गरज आहे. प्रत्येक क्षण आणि प्रत्येक श्वास नीट निरखून पाहत जगण्याची गरज आहे. खरंच खूप कठीण असतं का असं जगणं? 

वर्षा वेलणकर 

Friday, July 4, 2014

ख़ामोशी से बातें

ख़ामोशी से बातें 

कलम से टपकती स्याही की दो बुँदे 
उठाके मैंने रख दी थी तुम्हारे लबोंपे
इसी उम्मीद में  

के कुछ तो कहोंगी तुम

ख़ामोशी चुभती है तुम्हारी


-------

बातें...
तुने कही हुई वह दो बातें
जो गाँठ बाँध ली है मैंने


के जिंदगी और मोहब्बत
सुर्ख गुलाब होते हैं 
काटों में खिलते हैं 
कांटों में पलते हैं 
काटों में मिलते हैं 
और कांटो से ही छिलते हैं 


बातें...
तेरी कही हुई बातें 

मैंने गाँठ बाँध ली है
गुलाब की सुर्खी का राज 

आज मैंने जाना है
तेरी कही हुई बातों से


वर्षा वेलणकर 

Tuesday, June 10, 2014

सूरज

सूरज

"सुनो, एक बात है जो कहनी है तुमसे…

रोज जब शाम का घुंघट ओढ़े
मिलने आती हो मुझसे
तुम्हारी आग़ोश में समाकर
सुकून मिलता है जी को
ढल जाता हूँ तुमही मे…

तुम्हारी बेपर्वा बिखरीं जुल्फोंकी स्याही में
जब डूब जाता हूँ
टूँट के बिख़र जाता हूँ मैं…

तुम आँखे मूँद लेती हो
तो बेचैन होकर
ढूँढने लगता हूँ
अपनेआप को
ढूंढता हू वजूद अपना
चमचमाते जुगनूओंके ज़िस्म में
फ़लक पे बेतहाशा बिखरे तारोंमे
मैं अपनी रोशनी, अपना वज़ूद ढूंढता फिरता हू
रातभर…स्याह अंधेरोंमे…

बरबस पलकें उठाती हो तुम
मुस्कुराकर देखती हो मुझको
तो सुबह खिलती है आँगन में
बालोंमे अटके टिमटिमाते टुकड़ोंको
बटोंरकर हथेलियोंमे
थाम लेती हो तुम
टूकडोंमे सिमटासा मैं
तुम्हारी मुस्कुराती आँखोमे
फिर ढूंढने लगता हूँ वजूद अपना…

हथेलियोंसे आँगन में
उछाल देती हो मुझे
अपनी रोशनी समेटे
चलता हूँ दिनभर
जलता हूँ दिनभर
अपनीही चकाचौंध रोशनी में
ढूंढता रहता हूँ वजूद अपना…

सुनो, मगर एक बात है जो कहनी है तुमसे…

रोज जब शाम का घुंघट ओढ़े
मिलने आती हो मुझसे
तुम्हारी आग़ोश में समाकर
सुकून मिलता है जी को
ढल जाता हूँ तुमही मे…"

वर्षा वेलणकर


Wednesday, June 4, 2014


जगणं  


पापणी ओली चिंब व्हावी, पाऊस झेलून घेताना
शहारलेल्या झाडाला, घट्ट बिलगुन जाताना
वारा यावा मृदगंध घेऊन, श्वासही भिजून जावा
हळव्या मनाच्या मातीत, तो एक क्षण रुजावा 
शिंपण त्याला पापणीतून झरणाऱ्या पावसाचं 
कधी ओल्या दिवसांचं अन मातीच्या गंधाचं 
अंकुरेल क्षण तशा पालवत जातील आशा 
विस्तारण्यासाठी त्याला पुरतील दाही दिशा?
असे क्षण रुजवून-भिजवून राखलय एक रान 
पाऊस झेलत, चिंब भिजत, जगणे एक तूफान 

वर्षा वेलणकर 

Thursday, May 22, 2014

गुल्लक

गुल्लक 

कल रात बडी उमस थी हवा में 
नींद नहीं आयी तो गुल्लक तोड़ा 
सिक्के उंडेलके बैठ गई गिनने 

कुछ रोज मिलनेवाले सिक्के थे 
इन्हें संभालके रखो तो पर्स भारी हो जाता हैं 
रोज शाम घर आतें ही पर्स खोलकर 
सिक्के गुल्लक में डाल देती हू 
जरूरत से ज्यादा होते हैं शायद 
इनका वजन उठाने की न तो हिम्मत होती हैं 
और न ही ताकद 
भारी भारी सा कुछ भी अच्छा नहीं लगता 

कुछ नए सिक्के जो सरकारने बाज़ार में लाए है 
नए है और अच्छे दिखते है तो खर्च करने का मन नहीं होता 
लाकर गुल्लक में डाल देती हू 
गिनती में कम है पर अलग है 
नया हो और अलग भी तो अच्छा लगता है 

कुछ सिक्के अब बाज़ार में नहीं चलते 
और 'अनमोल' हो गए है 
तो इसलिए उन्हें पास ही रख लिया है 
हरबार गुल्लक तोड़ती हु तो इन्हे अलग कर देती हू 
और फिर नए गुल्लक में डाल देती हू 
बिल्कुल सबसे पहले 
ये न तो गिनती में कम होते है न ही ज्यादा 

फिर ख़याल आया,
सारे के सारे सिक्के ही क्यों जमा किए है मैंने?
नोट कहा हैं?
उनका तो मोल ज्यादा होता हैं? 
और वज़न ना के बराबर? 
तो क्यों खर्च कर दिए मैंने?
क्या उन्हें रोज खर्च करना जरूरी था? 

गिनते -गिनते ख़याल आया 
यादें भी तो जमा की है मैंने दिल के गुल्लक में!

कुछ रोज मिलनेवाली, वजन से भारी 
और जरुरत से ज्यादावाली यादें;
कुछ जो नई-नई  अलग दिखनेवाली यादें;
कुछ वो जो अब मायनेँ नहीं रखती और अनमोल है 
न गिनती में कम होती है न ज्यादा 
जिन्हे जतन किया है मैंने 
साथ ही साथ उनकाभी हिसाब लगाना होगा 
जो यादें जमा नहीं की कभी 
नोटों की तरह खर्च कर दी 
जिनका मोल ज्यादा था और वजन कम 

खैर, यह सब फिर कभी होगा 
जब किसी रात  हवा में उमस होगी 
और आंखो से नींद नदारद होगी 

फिलहाल इन सिक्कोंको समेट लू 
कल जाकर दुकानदार को दे आऊ 
बदलें में नोट ले आऊ 
क्योंकी उनका वजन कम होता है 
और मोल ज्यादा!
पर हा एक बात है, नोट ख़र्च हो जाते है!

वर्षा वेलणकर  




Wednesday, May 7, 2014

तुम्हारा साथ



तुम्हारा साथ

लुत्फ़ उठाने ज़िंदगीका 
एक और साँस ली हैं 
हैराँ हैं देख के यह मन्ज़र 
ज़िंदगी तुमसे जो बाँट ली हैं 

एक कोना आँगन का
एक टुकड़ा आसमान 
एक घने पेड़ से टपका 
सपना भी साथ ही हैं 

पत्तोंसे झरती धूप हैं 
बरसात में रिसता पानी 
खुशियोंके गुल-गुंचे है 
ग़मोंकीभी सौगात मिली है 

हर एक पल, हर लम्हा  
आगाज़ नए मौसम का 
होंठोंके गुलोंसे पूछों 
अश्कोंकी नवाजीश हीं है
ज़िंदगी तुमसे जो बाँट ली हैं

वर्षा वेलणकर  


Friday, April 11, 2014

खरं खरं सांगा

खरं  खरं सांगा 

खरंच सांगा बरं मला 
देश नेमका काय असतो?
कष्टणारे दोन हात 
की शर्यतीत धावणारे पाय असतो?

खरंच सांगा मला 
देश म्हणजे नेमकं काय?
कमवून आणणारा बाप 
की घर सावरणारी माय?

खरंच जाणून घ्यायचंय मला 
देशाला कोण चालवतं?
मूठभर नेत्यांचं सरकार 
की लोकसंख्येलाच ते पेलवतं?

खरंच एकदा सांगा कुणी 
नेमकं कोण देशाची शान?
राष्ट्रभक्ती मिरवणारे चेहरे 
की जान देणारे जवान?

वर्षा वेलणकर  


Friday, April 4, 2014

वृद्धाश्रम




वृद्धाश्रम 

बये, संपली बघ गोष्टं 
आता सांगण्यासारखे काही उरले नाही माझ्याजवळ 
तू विचारलेस म्हणून सांगते आहे 
संपलेल्या त्या गोष्टीत मी ही होते गं बये 
तुला दिसली का गं मी? 
गोष्टीच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात होते मी 
माझ्या अस्तित्वाच्या दिव्यातील वात सावरत होते 
वातीच्या टोकाला पेटलेल्या अंगाराच्या जागी 
काळे काळे ठिपके चिकटले होते 
काजळी धरली होती 
तुला ही नाही दिसले का गं मी? 
तुला म्हणून सांगते, अगं माझीच गोष्टं होती ती 
रक्त संपलं गं देहातील 
मग वात जळणार कशी, सांग बघू?
आणि बये, विझल्या दिव्याला कुणी तुळशीजवळ ठेवतं का गं? 
माझं म्हणशील तर काजळी धरलीय वातीवर 
रक्तच नाही शरीरात, वातीला देऊ तरी काय?
बये, माझी गोष्टं मलाच ऐकवशील एकदा?
कुणीतरी वात पळवून नेण्यापूर्वी 
बये, माझी गोष्टं मलाच ऐकव ना गं एकदा! 

वर्षा वेलणकर 

Monday, March 31, 2014

खजाना



हर साल बढ़ती उम्र को मिली दुआओंको
संभालकर के रख देती हु मैं एक सन्दुक में
जैसे ढलती हुई शाम की संदली धुप को
अपनी शाखोंमे छुपाने की कोशिश करता हुआ
मेरे आँगन का पेड़

कुछ ग्रीटिंग कार्ड है
मेरा नाम लिखा है ऊपर
निचे किसी और की लिखी
कुछ पंक्तिया हैं
मुझे बधाई देती हुई
सबसे निचे लिखे हुए नाम के साथ
रख लिए है अपने समझ के
मैंने मेरे सन्दुक में

कुछ दुआए सरपे हाथ रख कर दी थी
वो बुजुर्ग थे और मैंने पाँव छूए थे उनके
वो छुअन भी जतन करना चाहती हू
जन्मदिन पर मिले उपहारोंके साथ

हर साल मां जन्मदिन पर
कपडे खरीद कर लाती हैं
वो जतन नही किए कभी
बारबार पेहनके पुराने कर देती हुं
हर बार, हर साल
क्योंकी मां हर साल नया कपडा दिलाती हैं

सन्दुकमें रखें बर्थ डे विश,
सरपर रखें हाथोंसे दिल में उतरी दुआए
वो कुछ चुनिंदा उपहार
संदली धूप बटोरता आंगन का पेड
सब कुछ नही संभाल पाता हैं
पत्तोंसे छनकर कुछ किरने बरस जाती हैं
आंगन में पत्तोंका ढेर भी लग जाता हैं हर शाम
उसके नीचे छुप जाता हैं
मां नें पुता हुआ वो आंगन का हिस्सा 
पर मुझे पता हैं
मां हर दिन सुबह होते ही
आंगनमें झाडू लगाती हैं

मां नें फिलहाल ही नया ड्रेस खरीदके दिया हैं 

वर्षा वेलणकर 

Sunday, March 30, 2014

काही बोलायाचे आहे…


बोलायचं असतं. प्रत्येकाला. कदाचित संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाशीच. बोलायचं असतं. कधी थोडं, कधी खूप. कधी प्रेमाचं. कधी रागावून. कधी तिटकारा आला म्हणून सांगायचं असतं तर कधी भावलं बरं का मनाला, म्हणून सांगायचं असतं. कधी कधी तर, आज काहीच कसं बोलायला सुचत नाही आहे, हेच बोलायचं असतं. पण बोलायचं असतं प्रत्येकाला. 
माणसाला बोलता येतं आणि म्हणून तो समृद्ध होत गेला असावा. घशातून येणारे आवाज इतरांच्या समोर निघाले आणि त्यानंतर मिळालेली प्रतिक्रिया पाहूनच खूप खूप आवाज निर्माण करण्याची उर्मी जागृत झाली असावी. शब्द निर्माण झाले असावे आणि त्याचे अर्थही निश्चित होत गेले असावेत. आवाजाला शब्दाची आणि अर्थाची मिळालेली जोड माणसाला बोलतं करून गेली. असंच झालं असेल ना? तुम्हाला काय वाटतं? काहीतरी नक्कीच वाटत असणार. तुमच्याकडेही एक प्रतिक्रिया असणार. मग ती देण्यासाठी बोलते व्हा! 
बोला. आपण सारेच बोलण्यास उत्सुक आहोत. काही बाही सतत सांगण्याची आपल्यालाही हौस आहे आणि मी तर म्हणते जिवंत राहण्यासाठी जसे श्वास घेण्याची गरज असते ना तसेच जगण्यासाठी बोलण्याची गरज आहे. डोकं आणि विचार दिले आहेत निसर्गानं आणि म्हणून त्या डोक्यात येणारे विचार बोलून व्यक्त करण्याची गरज आहे. कारण डोकं बोलतं, मन बोलतं. आपल्याशी बोलतं. आपलंच आपल्याला सांगतं. 
डोळेही काहीतरी सांगतातच. डोळ्यांनी दिसणारे आवडले की न-आवडले ते शब्दात सांगण्याची गरज आहे. दारात आलेल्या माणसाचे स्वागत आहे की नाही, हे बोलून दाखवण्याची गरज आहे. आलेल्या व्यक्तीमुळे कुठे काही दुखावलं जाणार असेल तर जरूर बोलण्याची गरज आहे. आणि समजा आलेल्याच्या पावली प्रसन्नता, मांगल्य, आनंद, सुख, समाधान आलं असेल तर तेही बोलून दाखवण्याची गरज आहे. 
गरज आहे बोलण्याची आणि बोलायचंच आहे प्रत्येकाला. स्वतःच्या अनुभवांबद्दल - चांगल्या आणि वाईट दोन्हीबद्दल. शरीराला झालेल्या दुखापती बद्दल बोलायचं असतं आणि मनावर उठलेला ओरखडाही शब्दातून दाखवून द्यायचा असतो. उमललेल्या फुलासारखं मन बहरलं असेल तर तेव्हाही शब्दच येतात मदतीला आणि कधी त्याची कविता होते तर कधी एखादी कथा. इतरांना बोलतं करणारी ठरते ती. पुन्हा शब्दांचे धबधबे कोसळू लागतात. चिंब चिंब भिजवणारे आणि कधी कधी प्रवाहात ढकलून देणारे. पोहता येतं की नाही, हे ही कुणाला बोलून ठेवलेलं असेल तर बरं असतं. नसेल पोहता येत तर कुणीतरी मदतीचा हात तरी पुढे करणार ना! मदतीसाठी हाक मारायलाही बोलता यायला हवं. 
बोलता आलं पाहिजे प्रत्येकाला. ज्या समाजात जगतो त्याच्या उण्या-दुण्याबद्दल बोलता यावं. असं उणं-दुणं काढण्याची परवानगी समाजात आहे कि नाही, हे ही बोलून दाखवता यावं. अधिकारांची भाषाही कळायला हवी आणि जबाबदारीचा सूरही लावता यावा. शब्दांची जोड यालाही असतेच. योग्य शब्द निवडता यावे आणि ते कुठे आणि कसे वापरावे हेही मनाला आणि बुद्धीला बोलून दाखवता यावं. म्हणजे कंठालाही योग्य जोडीदार मिळाल्याचं समाधान मिळेल. 
बोलावं जरूर प्रत्येकानं. कारण नाही बोललं तर विचार डोक्याला भंडावून सोडतील आणि मग भंडावलेलं डोकं फुटण्याची पाळी येईल. म्हणून बोलावं माणसानं. भडभडा बोलून मोकळं व्हावं. कधी प्रत्यक्ष बोलावं. कधी फोन वरून बोलावं. कृतीतून बोलावं, इशाऱ्याने बोलावं, कवितेतून बोलावं, चित्रातून बोलावं, गाण्यातून बोलावं, स्वयंपाकातून बोलावं, मेंदीतून संवाद साधावा तर कधी रांगोळीतून व्यक्त व्हावं. 
आणि कधी कधी काहीच न बोलता शांतातेतूनही बोलावं… 
पण बोलावं. कारण बोलायचं असतं. प्रत्येकाला. संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाशी. 

वर्षा वेलणकर 

Friday, March 7, 2014

"या शहरात आलं की आठवणींचं अगदी मोहळ उठतं… रोज मोठ्या हिकमतीन विरजण लावलेली साय जोरात घुसळावी आणि लोण्याचा गोळा वर तरंगावा तसं काहीतरी घडतं. लोण्यासारखी मऊशार आणि तरीही घट्ट नाती डोळ्यासमोर दिसतात. जीव टाकणारी माणसं दिसतात आणि जीव डोळ्यात गोळा  होतो."
किती पुस्तकी प्रतिक्रिया, म्हणून हसतील सगळे. पण वाटलं तेच आणि तसंच ओठावर आलं तर काय बिघडतं?  पोटात तेच ओठात, असं  असू नये का? पण विराजणातून वर येणाऱ्या लोण्याबद्दल लिहिताना खाली राहिलेल्या ताकाचा आणि त्याच्या पातळ असण्याचा उल्लेख अगदी मनापासून आला तरी लिहू शकते का मी? की टाळावं लागेल ते मला? कुणी दुखवू नये किव्वा कुणाला मुद्दाम दुखवू नये हे देखील पुस्तकातच वाचलंय. मग लिहिताना पुस्तकांना प्रमाण मानूनच लिखाण करावं लागेल. की मनापासून येणारी उर्मी जोपासू?
पुन्हा प्रश्नांच्या जंगलाचा एक प्रवास!
वर्षा वेलणकर 

Thursday, February 13, 2014

तलाश


तलाश 

एक रिश्ता बुना तुमसे, 
रेशमके धागे से   
सपना था या हक़ीक़त, 
सोये थे हम या जागे थे?

रिश्ता वो जो बुना था तुमसे 
ये दौर तभीसे चला है 
कोशीश लाख़ कि है मैंने 
पर अब पता चला हैं 

उस रिश्ते का ताना-बाना  
लफ्जोंसे उसका जोड़ लगाना 
काम कोई आसान नहीं 

इसीलिए कुछ किताबोंसे
और सितारोंसे जड़े ख्वाबोंसे 
कुछ लफ्ज उधार लिए हैं मैंने
 
क्योँकि बयाँ करनी हैं 
तुमसे जुड़ी बातें सारी 
थोड़ी अपनीसी है 
बाकी बस सिर्फ तुम्हारी 

पर उधार लफ्जों में वो बात कहा? 
हमनें देखें हैं जो दौर 
वैसे किसीके हालात कहाँ?

वो जो कहनी है दास्ताँ 
वो सिर्फ़ हमारी हैं 
बयां करने वो कहानी 
अभी लफ्ज़ो कि तलाश जारी हैं 

वर्षा वेलणकर 

Sunday, February 9, 2014

माझ्या 'आदर्श' शिक्षिका

मार्च महिना आणि १९ तारीख!  माझा वाढदिवस आणि नेमका त्यादिवशी दहावी बोर्डाचा पेपर! मला अभ्यास आणि परीक्षांचा तिटकारा आहे. चोवीस वर्षांपूर्वी माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच असलेल्या पेपरमुळे त्यात आणखी भर पडली होती. पण माझा तो वाढदिवस मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही ते एका व्यक्तीमुळे. माझ्या शिक्षिका रेखा फडणवीस यांच्यामुळे. पेपर सुरु होणार तेवढ्यात शाळेतल्याच एक इतर शिक्षिका आल्या आणि त्यांनी हातात एक कार्ड ठेवलं. शेकडो विद्यार्थिनी ज्यांच्या हाताखाली शिकून दरवर्षी निघून जातात त्या शिक्षकाने आपला वाढदिवस लक्षातच ठेवला नाही तर कार्डही पाठवावं, हे स्पेशल नाही का? मला आजही तो क्षण आठवतो आणि आठवतात माझ्या रेखा मॅडम. आणि हे सगळं स्पेशल यासाठी की मी स्पेशल नव्हते. मी कधीच एक खूप हुशार विद्यार्थिनी नव्हते. पण मला त्या अतीसामान्य असण्याच्या भावनेतून बाहेर काढून एक थोडंसं वेगळं आयुष्य जगायला शिकवलं ते रेखा मॅडम यांनी आणि म्हणून त्या माझ्या आयुष्यात कोरल्या गेल्या आहेत. 
घरी आई आणि शाळेतल्या बाई, एवढंच महत्वाचं असलेल्या वयाच्या टप्प्यावर मला रेखा मॅडम भेटल्या. खूप प्रसन्न चेहरा आणि कायम उत्साहाने प्रत्येक काम करणाऱ्या या मॅडम आमच्या प्रत्येकाच्या आवडीच्या होत्या. मग त्यांना फुलं आणणं आणि ते त्यांनी खूप हौसेनं केसात माळणं जितकं प्रेमळ होतं तितकंच त्यांचं विद्यार्थ्यांना हाताळणंही प्रेमळ होतं. पण त्यांनी कधी कुणाचे अवाजवी लाडही केले नाही. चुकांना त्यांच्याकडे माफी नव्हती. अभ्यासात कसूर केलेली त्यांना कधीच चाललं नाही. पण म्हणून त्यांनी कधी त्याचा खूप बाऊही केला नाही. वर्गात सगळ्यांना शिक्षा झाली आहे किव्वा जोरात ओरडून कुठली गोष्टं पटवून देण्याचा प्रयत्न त्या करताहेत असं कधीच झालं नाही. त्यांच्या विषयात चांगले मार्कं मिळावे ही धडपड त्यांनी त्यांच्या या विशेष स्वभावातून आमच्यात रुजवली. 
शाळा सुटली आणि वय वाढल्यावर आलेल्या जराश्या शहाणपणातून आता कळतंय की त्यांचा विषय होता एक चांगलं व्यक्तिमत्व घडवणं. खूप भव्य दिव्य काही करण्यापेक्षा फक्त एक चांगलं माणूस म्हणून आपले विद्यार्थी ओळखले जावेत, हे त्यांचं शिक्षण होतं आणि फक्त माझ्यासंदर्भात सांगायचं झालं तर ते आजही त्यांच्या हातून घडतंय. दहावी नंतर माझी शाळा सुटली पण मॅडमशी जुळलेली नाळ कायम राहीली. कॉलेजच्या अनिर्बंध वातावरणातही पाय जमिनीवर ठेवण्याचा संस्कार त्यांनी कधी रुजवला मला कळलंही नाही. नोकरी मिळाल्यानंतर ती करताना शंभर टक्के मेहनत करण्याची शिकवण त्यांनी शब्दातून नाही तर त्यांच्या स्वतःच्या कृतीतून पोचवली. काहीही अडचण आली आणि त्यांना ती पत्रातून कळवली की त्यांनी ती उत्तरातून सोडवली म्हणून समजा. ते ही सामान्यतः शिक्षक ज्या अधिकारानं सांगतात तसे नाहीच. त्यांच्यात आम्हाला एक मैत्रिण सापडली होती. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर येणाऱ्या भावनावेगांना समजून घेणारी, अंगी असलेल्या छोट्याश्या का होईना पण गुणांना प्रोत्साहन देऊन त्याचा आयुष्यात कुठे आणि कसा वापर करता येईल हे हळूच मनावर बिंबवणारी अशी ही वयानं, आदरानं मोठी असलेली मैत्रिण! वयाचा मोठेपणा आणि आदरयुक्त भीती त्यांनी आमच्या मनात निर्माण होऊ दिली नाही. एक आदर्श शिक्षक याहून वेगळा काय असणार! 
चोवीस वर्ष झालीत पण आजही मॅडमचं माझ्या आयुष्यातील स्थान कायम आहे. पत्रकारिता सोडल्यानंतर काहीतरी वेगळं करायचं डोक्यात होतं. मला मॅडमच्या रुपात मिळालेल्या मैत्रिणीमुळे आयुष्य सुकर करता आलं तशीच कुणाचीतरी आपणही मैत्रिण व्हावं, असा विचार आला आणि मॅडमने माझं तेही स्वप्न पूर्ण केलं. एका शतकपूर्ती करणाऱ्या शाळेत त्या मुख्याध्यापिका आहेत आणि तिथेच त्यांनी मला माझ्या छोट्या मैत्रिणींशी गप्पा करण्याची संधी दिली. पुन्हा मला शाळा अनुभवता आली आणि पुन्हा त्यांच्या आदर्श वर्तणुकीला जवळून पाहता आलं. त्यांचा प्रसन्न चेहरा आजही तितकाच प्रसन्न आहे आणि कामाचा उत्साहही. एक कुशल प्रशासक त्या आहेत मात्र त्यांच्या शिक्षकांच्या टीममध्ये खूप पॉपुलर आहेत. आजही त्या जे काही शिकवतात ते त्यांच्या कृतीतून. मग तो नीटनेटकेपणा असो की वाचनाची आवश्यकता. नवीन काही शिकण्याचा उत्साह असो किव्वा शिकवण्याची हौस. अशात त्यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित झाल्यानंतर झालेला आनंद व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे आहेत. त्या आहेतच आदर्श शिक्षिका. फक्त आता त्यावर पुरस्काराची मोहर लागली आहे. 

वर्षा वेलणकर

Monday, February 3, 2014


प्रीती लिमसे-शाह ये तुम्हारे लिए. 


दिन, महीने, साल बढ़ी उम्र कि परते उठाई  
तो दिल के कोनेमें पड़ी हुई इक चीज़ नजर आई 

मैं हैरान, दिल तो ख़ाली पड़ा था सालोंसे 
नहीं किसी का आना-जाना,
दरवाज़े सारे बंद रखें थे तालोंसे

हाथ बढ़ाकर उसे टटोला, और एक आवाज लगाई 
जान थी उसमें, नजर उठाके वो मुस्काई 

"बचपन नाम है मेरा, साथ तुम्हारे जन्मी थी  
मुझे उठालो और संभालो, मैं तुम्हारी अपनी थी"

बचपन का थामा हाथ तो टूटें सारें ताले 
ख़ुल गए दरवाज़े, 
अब दिलमें यादोंके सतरंगी मेले 

वर्षा वेलणकर    

Sunday, January 26, 2014

शाम


शाम 

शाम कुछ इस तरहसे आंगनमें उतरती है मेरे 
माँ कि लोरी सुनकर 
नींदसे बोझिल पलकोंको बरबस उठाकर 
मुस्कुराते नन्हें बच्चे कि तरहा 
शाम कुछ इस तरहसे आंगनमें उतरती है मेरे

शाम कुछ इस तरहसे आंगनमें उतरती है मेरे
पत्तों कि झुरमुटसे सुनरहरी किरणे बिखेरतीं 
जैसे गालों को सेहलाती हुई  
नानीकी झुर्रियों भरी हथेलियाँ 
शाम कुछ इस तरहसे आंगनमें उतरती है मेरे

शाम कुछ इस तरहसे आंगनमें उतरती है मेरे
दिनभर उम्र काँटकर बुजुर्ग हुए सूरज कि तरहा 
जिंदगीकी सच्चाई को हवा के झोंकेमें पिरोकर 
कानोंमे बुदबुदाती हुई 
शाम कुछ इस तरहसे आंगनमें उतरती है मेरे

वर्षा वेलणकर 

Thursday, January 9, 2014

डायरीचे एक पान…


डायरीचे एक पान… 

जून २४, २०१२

पावसानं रात्री जोर धरला आहे…  अशात, डोळे मिटून फक्त पडून राहणं शक्य असतं? शक्य नाही… पहाटेपासूनच ढगांनी आसमंत आणि सारा परीसर झाकोळून टाकला आहे…  फक्त ओलावा घेऊन निसर्ग पुढ्यात उभा ठाकलेला… सतत एकच जाणीव… अजून खूप काही दडलंय आत आणि देर आहे ती  बरसायची… रात्र कदाचित त्यासाठीच राखून ठेवली गेली असेल… 
हॉटेलच्या खिडकीमागे दाट झाडी असल्यानं पावसाचा बरसण्याचा नूर आणि स्वर वेगळा आहे. त्यात पानांची सळसळ आणि झाडांमध्ये वाहत्या वाऱ्याचा आवाज…खिडकीचा पडदा बाजूला सारून जरा डोकावून पाहिलं तर अचानक झाडाची एक फांदी वाऱ्याच्या ओघात काळोखातून खिडकीकडे झेपावली. दचकायला झालं. निसर्गाच्या इतर रूपांचा आस्वाद घेताना आनंद होतो. मग रौद्र रूपाचं भय का वाटावं? प्रश्न…त्यात  झाडातून वाहणाऱ्या वाऱ्याचं घोंघावणं मिसळलं आणि 'भय' या शब्दाचं वजन आणखी गडद झाल्याचं जाणवलं. 
सगळीच सरमिसळ…थोडा उत्साह…थोडा आनंद…थोडं स्तिमित होणं…थोडा विचार आणि खूप सारा अविचारही…थोडं त्यात उदासलेपण देखील डोकावतं…इथे येतानाच पावसानं घाटात गाठलं. मान्सून जेमतेम सुरु झाला असताना डोंगराकडे धाव घेणं म्हणजेच पाऊस अंगावर झेलण्याची इच्छा अनावर होणं, नाही का? मग घाटातच त्यानं गाठलं तर आनंद होणारच! डोंगर माथ्याशी पोचेपर्यंत धूक्यात वाटही दिसेनाशी झाली. अपेक्षा होती तसाच मौसम… अमाप आनंद…पण गडद धुक्याची भीतीही दाटून आली मनात. सगळीच भावनांची सरमिसळ… 
थोडं शांत बसण्याचा प्रयत्न करतानाच अचानक वाऱ्याची झुळूक यावी तसे विचार छळतात. त्याला छळ तरी कसं म्हणायचं? डोकं आहे, बुद्धी आहे तर मग विचार येणारच ना! विचार छळतात असं म्हणणं किती नकारात्मक वाटतं! पण का? 'का'चा विचार केला तर लक्षात येतं, मनाविरुद्ध आहेत किंवा आलेल्या विचारातून निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही म्हणून त्याचा त्रास होतो. मनाविरुद्ध आहेत खरे, आणि कदाचित अनुत्तरीतही असतील. पण म्हणून त्यांना वाईट म्हणायचं? पुन्हा एकप्रश्न. या प्रश्नांचा आता निकाल लावायलाच हवा. तात्विक किंवा सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जरा तत्वज्ञानाकडे जाणारा विचार केला तर मला वाटतं, का शोधायचं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर? काय गरज आहे त्याची? राहिलं काहीतरी अनुत्तरीत तर बिघडतं का काही? 
दैनंदिन आयुष्याशी निगडीत असतील तर  प्रश्न सोडवायलाच हवे. गरजच आहे ती. त्यातही दैनंदिन आयुष्यात ज्या लोकांशी नाळ जुळली आहे त्यांच्यासाठीच्या प्रश्नांची उत्तरं मिळवायलाच हवी. नातं सुख घेऊन आलेलं असेल आणि तरीही त्याबाबत काही प्रश्न निर्माण झालेले असतील तर ते नातं आणखी समजून घेण्यासाठी संबंधित सर्व प्रश्न सोडवण्याची गरज आहे. नात्यात तणाव निर्माण करणारा प्रश्न असेल तर मग तातडीनं सोडवावा. नाहीतर गुंता वाढतंच जाणार हे निश्चित. 
पण सगळीच सरमिसळ आहे खरी. त्याला गुंतागुंत म्हटलं तर ती प्राधान्यानं सोडवायला हवी. कारण काही गाठींची उकल फार फार आवश्यक असते. पण ती फक्त सरमिसळ असेल तर त्याचा हळुवार आनंद घेत प्रत्येक भावना आणखी खोलवर उतरून पाहण्याचा प्रयत्न व्हावा. डोंगरावरच्या या सुखद वातावरणात हा साक्षात्कार व्हावा, याहून समाधान देणारं काय असेल? 
खूप उंच आहे म्हणून वाहणाऱ्या ढगांना रोखण्याची ताकद डोंगरात आहे. इतकी उंची गाठली आहे त्यानं की ढगांनाही पायाशी लोळण घ्यायला लावतो तो. निसर्गातली सगळी सुबत्ता खेचून घेतली आहे त्यानं स्वतःकडे. पण सारंच काही त्याच्या मर्जी प्रमाणे नाही. त्याला संपूर्ण शरण जाणं आकाशानही सहज स्वीकारलेलं नाही. ढगांमध्ये डोंगरमाथे गुडूप होतातच ना! उंच उंच होण्यालाही शिक्षा असते का? वर आणि आणखी वर गेल्यावर आपलं अस्तित्वही कदाचित गुडूप होऊ शकतं, अशी मानसिक तयारी त्यालाही करावी लागत असेल, नाही? 
यशाची शिखरं पादाक्रांत करणाऱ्यांनाही हे असंच काहीसं अनुभवाव लागत असेल? तेही उंची गाठतात. सर्व प्रकारच्या ऐशोआरमाला पायाशी लोळण घ्यायला लावायची ताकद तेही मिळवतात. यशाबरोबर लोकप्रियताही येते. आणखी काय काय अनुभव घेत असेल अशी यशस्वी व्यक्ती? त्याच्या नशिबाचे भोग असतात तरी काय? सारं काही चांगलंच होतं का त्याच्या आयुष्यात? आणि तो हि सर्वार्थाने इतरांसाठी चांगलाच ठरतो का? 
डोक्यात प्रश्नांचे ढग दाटून आलेले आणि नजर खिळली आहे डोंगरावर. उंच डोंगरावर. 
एक वाऱ्याची झुळूक येते आणि ढगांच्या हातात हात घालून पुढे निघते. डोंगर दिसतो स्पष्ट. त्याच्या अंगाखांद्यावर खेळणारी छोटी-मोठी हिरवीगार झाडं दिसतात आणि दिसतात त्या डोंगरातील कपाऱ्या. सपाट, सरळ दरीत उतरणाऱ्या. डोंगरमाथा आणि त्याचं टोक आणि मग ती कपार. सरळ दरीत उतरणारी. 
डोंगर खुणावतात सामान्यांना. त्याचं सौंदर्य खिळवून टाकणारं असतं. म्हणूनच पावलं आपसूक तिकडे वळतात. स्वतःला रोखणं अशक्य असतं. पायाखालची वाट खेचत असते. पुढे, पुढे आणि आणखी पुढे. पार त्या शेवटच्या टोकापर्यंत. कपार नजरेच्या टप्प्यात नसते. असतं ते फक्त  सौंदर्य आणि इतर खूप काही. शिखारावरची सत्ता, मनाचं त्यावर अधिराज्य, भावनांचा बहर फक्त दिसतो. अशात फक्त पुढे पुढे चालण्याची उर्मी ढगांप्रमाणे दाटून येते. डोंगराचा शेवटचा टप्पा पादाक्रांत करायची उर्मी. स्वस्थ बसू देत नाही ती. मनाला आणि पायांनाही. पावसानं पायवाट निसरडी झालेली आहे आणि चिखलानं पाय फक्त माखलेच नाहीत तर काही ठिकाणी रुतून बसताहेत याचंही भान उरत नाही. फक्त त्या शेवटाची, त्या उंचीची ओढ लागली असते. 
शेवटी तो टप्पा दृष्टीपथात येतो. मनाची तिथे पोचण्याची ओढ पायांना वेग पुरवते. मन धावू लागतं आणि पाय त्याचं अनुकरण करतात. निसरड्या वाटेवर पाय ठरत नाहीत. पण वेगाला आवर घालणंही कठीण होऊन बसतं. फक्त आणखी काही पावलं आणि तो पहा आलाच शेवटचा टप्पा…श्वास फुललेला आणि पाय आसुसलेले…डोळ्यात आणि मनात अत्युच्यतेला स्पर्श करण्याचा आवेग…त्या अनुभवास आता फक्त काही क्षण उरलेले…अपेक्षांची पूर्तता करण्याची सर्व ताकद  मनात आणि मनातून पायांत आलेली…बस्स! हा आलाच तो क्षण!! आता तिथे पोचताच थांबायचं आणि फक्त आनंद लुटायचा. त्या टोकावर थांबायचं. डोळे सांगत असतात थांबायला. मनाला पटतं आणि पायांनाही कळलेलं असतं. पण पायाखालच्या वाटेला कसं कळणार हे सारं? पावसात चिंब भिजलेली, मनसोक्त न्हालेली ती आवरणार तरी कशी स्वतःला! पावलांना रोखण्याची जबाबदारी तिची नाही. ती फक्त पुढे नेणारी असते. मग ती जर कड्यापर्यंत जाणारी आणि तिथेच संपणारी असेल तरीही हा खुलासा तिच्या आधारानं चालणाऱ्याकडे करण्याची जबाबदारी तिची नाहीच. ती फक्त घेऊन जाणारी. तिच्या अंताशी चिखलानं माखलेल्या पायांना थांबता आलं नाही, आवरता आला नाही तर अशा पावलांच्या कडेलोटाची जबाबदारी तिची कशी? 
उंच डोंगर, हिरवागार साज, पावसाची मेहरबान नजर, घोंगावणारा वारा आणि मनातील भावनांची सरमिसळ! शिखराकडे कूच केलेल्या पावलांना हे सारं काही सांभाळता आलं पाहिजे. नाहितर…
धुक्यात एकतर काहीच स्पष्ट दिसत नाही आणि अशात भावनांची ही सरमिसळ… 

वर्षा वेलणकर 

Tuesday, January 7, 2014

ख़ुशी का गांव


ख़ुशी का गांव 

ज़िन्दगी मे एक दिन ऐसा आया
सूरज ने ख़ुशी का पता बताया
हमने उसका हाथ थामकर
और किरणोकी पगडंडीपर चलकर
एक एक कर कदम बढाया
जैसे जैसे दिन बढ़ा
सूरज पूरा परवान चढ़ा
हुआ मन मे सवाल खड़ा
क्या सचमुच इसने सच है कहा?
मै मुरख तो नहीं, इसकी बातोंमे बहा?
अगर है इसे मुझसे सच्चा प्यार
तो कहा है इसमे अपनेपन की फुहार?
क्यों है जलाता और तड़पाता?
क्यों नहीं ख़ुशी के घर ले जाता?
मै झल्लाया, चिढ़कर उससे हाथ छुड़ाया
किरणोकी राहोंसे हटकर
जा बैठा एक वृक्ष की छाया
वहा बड़ा आराम मिला
जलते तन का ताप ढला
लेकर चैनसे एक जम्हाई
थोडीसी पलकें झपकाई
नींद दबे पाँवसे आकर
सिरहाने आकर इतराई
बोली, मुझे पता है ख़ुशी का घर
चल मेरा हाथ पकड़
जाना है सपनोंके गाँव
बैठ जा निंदकी नाव
ना कोई तड़प, ना कोई जलन
वहा मिलेगी प्रेमकी छाव
नींद का जादू ऐसा छाया
मुझको उसने ऐसा भरमाया
मै भुला सूरज का साथ
और कही थी उसने जो बात
नींद का जादू और गहराया
उसने सूरजसे साथ छुड़वाया
भरम, सपनोका जाल डालकर
सच्चाईको  दूर भगाया
पर किस्मत मेरी अच्छी थी
नियत सूरज की सच्ची थी
पत्तोंको थोडासा हटाकर
ढलते ढलते मुझसे मिलने आया
कहा, जाग जा मुसाफिर
दूर अभी तेरी है मंजिल
अगर ख़ुशी के घर है जाना
थक-हार के नहीं बैठना
मै कल फिर आऊंगा
साथ तुझे ले जाऊंगा
हा थोडा दूर है खुशीका गाँव
डगर मुश्किल, नहीं कोई छाव
पर मै और सच्चाई साथ तुम्हारे
तो काहेको घबराना प्यारे
चल चला चल बढ़ता जा
वो देख वहा ख़ुशी का गाँव

वर्षा वेलणकर