Thursday, March 28, 2013

Finding one another....

दोन गोष्टी आयुष्यात खूप ऐकायला मिळतात. सूचना आणि प्रतिक्रिया. जे काही आपण करतो त्यासंदर्भात या सूचना आणि प्रतिक्रिया मिळतातच मिळतात. यातून कुणाचीही सुटका नाही. पूर्वी फक्त वयाने मोठे किव्वा जे ज्ञानाने मोठेपणा मिळवलेले होते त्यांनी केलेली सूचना पाळावी आणि स्वीकारावी असा प्रघात होता. केलेल्या कृतीवर असे मोठे लोक काय प्रतिक्रिया देतील याचीही उत्सुकता असायची आणि वचकही होता. पण त्याचा कदाचित अतिरेक झाला आहे आणि आता, हम भी पीछे नही, म्हणून प्रत्येक जण सूचना आणि प्रतिक्रिया देताना आढळून येतो. खरं सांगू का, मलाही आवडत नाही सूचना आणि प्रतिक्रिया. द्यायला आणि घ्यायलाही. एखाद्या वाहत्या नदीवर बांध घालण्यासारखं असतं ते.
कधी कधी जरा एखाद्या विचाराचा किस पाडला आणि त्याकडे निरखून पाहिल कि वाटतं तसं सारं कसं सोप होतं पण उगाच खूप complicated केल्या गेलं आहे. Action आणि reaction हे सगळं अगदी बरोबर आहे. पण जरा निरखून पहा, आपण प्रतिक्रियात्मक जगतो आहे. आणि सुचनानवर सुद्धा. लहानपणी सूचना …. असं नाही तसं, हे योग्य आणि ते बरोबर किव्वा हे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही आणि असंच खूप खूप आणि खूप काही. मग या सगळ्यावर आपण दिलेली प्रतिक्रिया म्हणजे कधी मान मोडून ऐकून घेणे नाहीतर बंडखोरी आणि त्यावर आणखी प्रतिक्रिया. एक वाक्य त्यात असतंच, हि आजकालची मुलं ना अगदी डोक्यावर बसली आहेत वगैरे वगैरे.
यावर एक प्रतिक्रिया नक्की येणार, कि मग काय मोठ्यांनी काही बोलूच नये? आणि प्रतिवाद काहीसा असा असेल, मग लहान्यानी काय फक्त ऐकायचंच का?
या दोन्ही टोकाच्या भूमिका आहेत आणि मुळात माझा मुद्दा काही वेगळाच आहे. म्हटलं ना कि action आणि reaction असणारंच. पण त्यात originality, ज्याला मी नैसर्गिक स्वभाव आणि असणं म्हणते, ते मात्र कुठल्या कुठे गुडूप होतं. प्रत्येक जन्माला आलेल्या व्यक्तीला एक व्यक्तिमत्व, सोप्या भाषेत ज्याला personality म्हणतात, ती असते. त्याचा मातीत म्हणजे जगात, वातावरणात रुजण्याचा आणि वाढण्याचा एक वेग असतो. त्याला मिळालेल्या वातावरणाचा आणि पोषक घटकांचाही त्यात वाटा असतो. माती कशी आहे, पाणी पुरेसं आहे कि नाही, ऊन, वारा बरोबर मिळतय कि नाही. हे सारं काही त्यात समाविष्ट असतं आणि त्यावर आधारित ते व्यक्तिमत्व घडतं. खरं तर सूचना आणि प्रतिक्रिया म्हणजेच खत-पाणी. पण कुणाला कुठलं खत आणि किती पाणी आवश्यक आहे यावर चिंतन खूप गरजेच आहे. ज्याला जे हवं ते आणि जितकं हवं तितकंच मिळावं. आणि यासाठी जो देतो आहे त्याला, ज्याला दिलं जात आहे त्याच्या नैसर्गिक स्वभावाची माहिती हवी. जो घेतो तो जर वयाने आणि बुद्धीने थोडा जाणकार असेल तर त्यानंही आपल्या गरजांना ओळखण्याची गरज आहे. काय हवं नको हे स्वतःला जोपर्यंत पुरेपूर कळत नाही तोपर्यंत उत्तर देण्याचा अधिकार मिळत नाही. मिळायलाही नको. पण तो अगदी खेचून घेतला जातोय, हा नवीन ट्रेंड आहे.
दोन व्यक्तिंमधली दरी जर वाढली आहे तर त्याला कारणीभूत हे आपलं परस्परांना न समजणं आहे. Originality काय आहे हे जर कळलं तर प्रश्न सगळे खल्लास होतात. कारण मग conflict राहत नाही ना, बरोबर? पण इतक सोपं नाही ते. Originality जाणून घेण्यासाठी थोडी मेहनत करावी लागते. Patience ठेवावं लागतं आणि हे कितीही गंभीर वाटत असल तरी त्यात असलेली जी मजा आहे ती लुटावी लागते. तेव्हा कुठे मग आपण आपल्यालाच दिसायला लागतो. पाणी खळाळलेलं असेल तर तळ दिसत नाही. पण शांत होण्याची वाट पाहिली कि सारं काही स्पष्ट दिसतं. मग नदीकाठावरची गम्मत आणि त्याच नदीची खोली पाहणं एक अलौकिक अनुभव ठरतो.
ग्रेस या कविबद्दल बोलताना महेश एलकुंचवार म्हणाले कि वाचकालाही काहीही वाचाण्यासाठीचा रियाज आवश्यक आहे. ग्रेस दुर्बोध वाटत असतील वाचताना तर तुमचा वाचनाचा रियाज कमी आहे हे कबुल करण्याची तयारी हवी. आजकालची मुलं आणि याचं काही कळत नाही असं जर वाटत असेल तर तुमचा त्यांना जाणून घ्यायचा रियाज कुठे कमी पडला ते पाहावं लागेल ना?
Just a thought....give a thought to it....
 
Varsha

Saturday, March 9, 2013

९ मार्च, २०१३
गुलज़ार साब,
आज आपसे मिलनेका दिन शायद मुक़र्रर था। कई साल हो गए है आपके अल्फाजोसे रिश्ता जोडकर। पर उस रिश्तेका कोई नाम नहीं था और ना हीं कभी कोई दिखनेवाला वजुद। हा, पर वो जिंदा था। आज जब आपके पाँव छूने के लिए हाथ बढ़ाये तो आपने कहा "जीते रहो!" जिन्दा तो है हम। क्योंकि साँसे चल रही है. पर जब कभी अहसास की बात चली तो आपसे लफ्ज उधार लेते चले गये हम। कभी ख़ुशी में तो कभी गम में। नाराज हुए तब भी और प्यार किया तब भी। कभी कही कोई रिश्ता, कोई एहसास, कोई सपना, कोई अपना बया करनेकी बात आई तो आपहिकी सहिसे लफ्ज जड़ी तकरिरोका सहारा मिला। बदलेमें कुछ देना नहीं था हमें आपको। इसलिए लेना और आसन हो गया।
 
आज आपसे मिलने का दिन मुक़र्रर था। शाम आप एक फंक्शन मे लोंगोसे मुखातिब होनेवाले थे। मै भी आना चाहती थी। लेकिन आप और हम लोगोंमे एक दीवार है जो आपको हमसे ऐसेही मिलने नहीं देती। उसी दीवारसे झांकने का इरादा था। झरोखा ढुंढने सुबह सुबह आई तो सामने आपको पाया। आप किताबोंके बीच खड़े थे और कुछ चुनिन्दा लोंगोंसे घिरे थे। नजर आपकी वही थी किताबोंपर। कभी चश्मा उतारकर तो कभी चढाकर आप एक-एक कोना जांच रहे थे। फिर आपकी वही खरजवाली सुकुनभरी आवाज में आपने कहा, "prose बहोत है यहा. पोएट्री कम है।" सही कहा आपने। आजकल लोग बड़े प्रैक्टिकलसे हो गए है। सब कुछ सुलछा हुआ चाहते है। कठिनाई पसंद नहीं उन्हें। जो कुछ कहो इनसे तो वो बिलकुल तरतीब से सजा हुआ, एकदम स्पष्ट। किसी चीज की कोई परते खोलना उन्हें झंझट लगती है। रिश्तेभी इन्हें साफसुथरे, सुलछे हुए चाहिये। प्यार तो प्यार, नाराजगी तो नाराजगी. और जब रिश्तोंमे कोई गाँठ लग जाये तो ये डोर तोड़ देते है। अगर उनसे कहों के, "हाथ छूटे भी तो रिश्ते नहीं छूटा करते". तो ये पलटकर जवाब देते है, "Come on यार, किस जमाने की बात कर रहे हो?"
 
खैर, जाने दिजिये। बात बस इतनी थी के आज आपसे मिलने का दिन मुक़र्रर था। शाम को नहीं सुबह्का वक्त तय था। आप बिलकुल वैसे ही लग रहे थे जैसे आप हमेशा होते है। जैसे आपको तसवीरों और टीवी पे देखा है। हमेशा की तरह वो सफ़ेद कुरता और पैजामा। सफ़ेद मोज़े और सफ़ेद स्पोर्टवाले जुते। आपका कुरता वैसेही कड़क था स्टार्च किया हुआ और बहोत सारी सिलवटोंसे भरा। पर फिर भी कड़क था। तना हुआ। हर उस शोहरतमंद इन्सान की तरह जिसे लोग ऊँचा तो उठाते है पर कभी कोई इतनीसिभी बात हो जाए तो उंगली उठानेसे भी नहीं चुकते। वो सारी सिलवटे चुभती तो है पर शख्सियत की मजबुतीकोभी बया करती है।
 
तो बात ये है, के आज आपसे मुलाकात हुयी। आपके पास आकर बैठने का मौका मिला। आपने नाम पूछा, काम पूछा। जब मैंने कहा के पिछले दिनों आपसे कांटेक्ट करना मुशील हो रहा था, तो आपने वो दीवार भी हटा दी जो आपसे मिलनेसे रोकती है। और जो किताब मैंने आपके हाथों में धर दी थी उसपर आपने लिखा, वर्षा, टू यू, गुलज़ार।
 
एक बेनाम रिश्ता जो आपके लफ्जोसे कई साल पहले जुड़ा था आज आपके हाथोने उस रिश्ते को एक पहचान दी है। अभीभी मै उस भीड़ का हिस्सा हु जो आपसे मुखातिब होना चाहती है। आपकी लफ्जोकी उधारी पर जीना चाहती है। कुछ सहिसे लफ्ज जड़कर आपसे कहना चाहती है के, गुलज़ार साब, वुई लव यू!
 
Varsha Welankar

Wednesday, March 6, 2013

आयुष्य सोपं करायचं म्हणजे नेमकं काय करायचं?
मला खूप प्रश्न पडतात. पण एक दशक आधी पडायचे त्याहून प्रमाण जरा आताशा कमी झालंय. पण प्रश्न आहेत अजुनहि. जिवंत असण्याचं ते लक्षण आहे, अशी माझी ठाम समजूत आहे. हं …तर मुद्दा किव्वा प्रश्न असा कि आयुष्य किव्वा आपण त्याला जगण म्हणू या, ते सोप्प कसा करायचं. अर्थात मी जे काही आता लिहिणार ते फक्त माझ्यापुरत आहे आणि ते माझे वैयक्तिक विचार आहेत. पण जमाना शेयरिंगचा आहे म्हणून ते इथे देण्याची उर्मी थोपवणे जरा अवघड आहे.
हा प्रश्न पहिल्यांदा कधी पडला ते आता आठवत नाही. पण तो डोक्यात गेली कित्येक वर्ष ठाण मांडून आहे. त्याचा त्रास कधी झाला नाही. पण मला उत्तरं शोधायचं होतं आणि मी त्यासाठी काहीना काही प्रयत्न सतत केले. माझं जगण सोप्प करायचं तर मला ते इतरांपासून वेगळं करावं लागणार, हे या प्रश्नाच्या उत्तरातील पहिल उत्तर होतं. वेगळ म्हणजे स्वतंत्र! आता पुन्हा प्रश्न, माझ्यासाठी स्वातंत्र आणि त्याचा अर्थ काय? निव्वळ आर्थिक स्वातंत्र? कि मला वाटेल ते करता येण्याची संधी? कि माझे निर्णय मला घेण्याची मुभा? कि कुणीही माझ्या कुठल्याही कृतीसंदर्भात स्वतःकडे जबाबदारी न घेणे? म्हणजे मी केलेल्या चुकांची (समाजाच्या दृष्टीकोनातून असलेली चुक. मला ती चूक म्हणून मान्य असेलच असे नाही.) जबाबदारी फक्त आणि फक्त माझी. माझ्या कुटुंबातील कुणालाही त्याबद्दल दोष दिल्या जाऊ नये, असे स्वातंत्र मला अपेक्षित होते का? होते का, असं म्हणतेय कारण हि सगळी चर्चा माझ्यापुरती मी केली त्याला एक दशक उलटून गेल आहे.
खरं तर जे काही वर लिहिलं ते सगळं मला त्या स्वातंत्र्यात अपेक्षित होतं. आणि आहे ही. आर्थिक स्वातंत्र्यासाठी नोकरी करणे अपरिहार्य होतं. ती मिळवली आणि अठरा वर्ष केली. पण स्वतंत्र होताना कुणाचीही सोबत नको असाही माझा आग्रह होता. कारण मदत घेणे म्हणजे स्वातंत्र नाही, हे हि कुठेतरी डोक्यात होतं. मदत करणारा कुठलं डोमबल्याच एकट जगू देणार? मदतीची परतफेड करावीच लागणार न! मग कसलं स्वतंत्र होण? पण सोबत करणारा जर माझ्या विचारांशी सहमत असेल तर? सुदैवाने मला अशी सोबत मिळाली आहे.
मग माझं जगण खरच सोप्पं झालं का? प्रामाणिक पणे सांगायचं तर तो प्रश्नच मी माझ्या डोक्यातून डिलीट केला होता. आज हे सगळं असं पुन्हा समोर आलं कारण आज सकाळी मला साक्षात्कार झाला कि माझं जगण खूप साधं, सरळ आणी सोप्पं आहे. कारण मला आयुष्यात काय करायचं आहे ते पक्क ठाऊक आहे. त्याची दिशा ठरली आहे आणि आता तर त्यादिशेनं वाटचालही सुरु झाली आहे. कुठलाही साक्षात्कार खूप आनंददायी असतो आणि आनंद हा इतराशी शेयर केला तर तो आणखी वाढतो. म्हणून हा लिखाणाचा उपद्व्याप!
खरच आयुष्य सोप्पं असतं. फक्त एकदा स्वतःची झाडाझडती करावी लागते. कुठे काय आहे दडलेलं ते शोधावं लागतं. त्या गुप्त ताकदीचा अंदाज घेत काही निर्णय घ्यावे लागतात. आणि असं करताना जे स्वातंत्र आपल्याला अपेक्षित आहे त्याचा पुरेपूर वापर करायचा असतो. वाटतंय का हे सगळं सोप्पं आहे? मला विचारलं तर मी हो म्हणणार. तुम्ही तुमचं उत्तर शोधा. शुभेच्छा!
वर्षा वेलणकर