Friday, April 4, 2014

वृद्धाश्रम




वृद्धाश्रम 

बये, संपली बघ गोष्टं 
आता सांगण्यासारखे काही उरले नाही माझ्याजवळ 
तू विचारलेस म्हणून सांगते आहे 
संपलेल्या त्या गोष्टीत मी ही होते गं बये 
तुला दिसली का गं मी? 
गोष्टीच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात होते मी 
माझ्या अस्तित्वाच्या दिव्यातील वात सावरत होते 
वातीच्या टोकाला पेटलेल्या अंगाराच्या जागी 
काळे काळे ठिपके चिकटले होते 
काजळी धरली होती 
तुला ही नाही दिसले का गं मी? 
तुला म्हणून सांगते, अगं माझीच गोष्टं होती ती 
रक्त संपलं गं देहातील 
मग वात जळणार कशी, सांग बघू?
आणि बये, विझल्या दिव्याला कुणी तुळशीजवळ ठेवतं का गं? 
माझं म्हणशील तर काजळी धरलीय वातीवर 
रक्तच नाही शरीरात, वातीला देऊ तरी काय?
बये, माझी गोष्टं मलाच ऐकवशील एकदा?
कुणीतरी वात पळवून नेण्यापूर्वी 
बये, माझी गोष्टं मलाच ऐकव ना गं एकदा! 

वर्षा वेलणकर 

Monday, March 31, 2014

खजाना



हर साल बढ़ती उम्र को मिली दुआओंको
संभालकर के रख देती हु मैं एक सन्दुक में
जैसे ढलती हुई शाम की संदली धुप को
अपनी शाखोंमे छुपाने की कोशिश करता हुआ
मेरे आँगन का पेड़

कुछ ग्रीटिंग कार्ड है
मेरा नाम लिखा है ऊपर
निचे किसी और की लिखी
कुछ पंक्तिया हैं
मुझे बधाई देती हुई
सबसे निचे लिखे हुए नाम के साथ
रख लिए है अपने समझ के
मैंने मेरे सन्दुक में

कुछ दुआए सरपे हाथ रख कर दी थी
वो बुजुर्ग थे और मैंने पाँव छूए थे उनके
वो छुअन भी जतन करना चाहती हू
जन्मदिन पर मिले उपहारोंके साथ

हर साल मां जन्मदिन पर
कपडे खरीद कर लाती हैं
वो जतन नही किए कभी
बारबार पेहनके पुराने कर देती हुं
हर बार, हर साल
क्योंकी मां हर साल नया कपडा दिलाती हैं

सन्दुकमें रखें बर्थ डे विश,
सरपर रखें हाथोंसे दिल में उतरी दुआए
वो कुछ चुनिंदा उपहार
संदली धूप बटोरता आंगन का पेड
सब कुछ नही संभाल पाता हैं
पत्तोंसे छनकर कुछ किरने बरस जाती हैं
आंगन में पत्तोंका ढेर भी लग जाता हैं हर शाम
उसके नीचे छुप जाता हैं
मां नें पुता हुआ वो आंगन का हिस्सा 
पर मुझे पता हैं
मां हर दिन सुबह होते ही
आंगनमें झाडू लगाती हैं

मां नें फिलहाल ही नया ड्रेस खरीदके दिया हैं 

वर्षा वेलणकर 

Sunday, March 30, 2014

काही बोलायाचे आहे…


बोलायचं असतं. प्रत्येकाला. कदाचित संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाशीच. बोलायचं असतं. कधी थोडं, कधी खूप. कधी प्रेमाचं. कधी रागावून. कधी तिटकारा आला म्हणून सांगायचं असतं तर कधी भावलं बरं का मनाला, म्हणून सांगायचं असतं. कधी कधी तर, आज काहीच कसं बोलायला सुचत नाही आहे, हेच बोलायचं असतं. पण बोलायचं असतं प्रत्येकाला. 
माणसाला बोलता येतं आणि म्हणून तो समृद्ध होत गेला असावा. घशातून येणारे आवाज इतरांच्या समोर निघाले आणि त्यानंतर मिळालेली प्रतिक्रिया पाहूनच खूप खूप आवाज निर्माण करण्याची उर्मी जागृत झाली असावी. शब्द निर्माण झाले असावे आणि त्याचे अर्थही निश्चित होत गेले असावेत. आवाजाला शब्दाची आणि अर्थाची मिळालेली जोड माणसाला बोलतं करून गेली. असंच झालं असेल ना? तुम्हाला काय वाटतं? काहीतरी नक्कीच वाटत असणार. तुमच्याकडेही एक प्रतिक्रिया असणार. मग ती देण्यासाठी बोलते व्हा! 
बोला. आपण सारेच बोलण्यास उत्सुक आहोत. काही बाही सतत सांगण्याची आपल्यालाही हौस आहे आणि मी तर म्हणते जिवंत राहण्यासाठी जसे श्वास घेण्याची गरज असते ना तसेच जगण्यासाठी बोलण्याची गरज आहे. डोकं आणि विचार दिले आहेत निसर्गानं आणि म्हणून त्या डोक्यात येणारे विचार बोलून व्यक्त करण्याची गरज आहे. कारण डोकं बोलतं, मन बोलतं. आपल्याशी बोलतं. आपलंच आपल्याला सांगतं. 
डोळेही काहीतरी सांगतातच. डोळ्यांनी दिसणारे आवडले की न-आवडले ते शब्दात सांगण्याची गरज आहे. दारात आलेल्या माणसाचे स्वागत आहे की नाही, हे बोलून दाखवण्याची गरज आहे. आलेल्या व्यक्तीमुळे कुठे काही दुखावलं जाणार असेल तर जरूर बोलण्याची गरज आहे. आणि समजा आलेल्याच्या पावली प्रसन्नता, मांगल्य, आनंद, सुख, समाधान आलं असेल तर तेही बोलून दाखवण्याची गरज आहे. 
गरज आहे बोलण्याची आणि बोलायचंच आहे प्रत्येकाला. स्वतःच्या अनुभवांबद्दल - चांगल्या आणि वाईट दोन्हीबद्दल. शरीराला झालेल्या दुखापती बद्दल बोलायचं असतं आणि मनावर उठलेला ओरखडाही शब्दातून दाखवून द्यायचा असतो. उमललेल्या फुलासारखं मन बहरलं असेल तर तेव्हाही शब्दच येतात मदतीला आणि कधी त्याची कविता होते तर कधी एखादी कथा. इतरांना बोलतं करणारी ठरते ती. पुन्हा शब्दांचे धबधबे कोसळू लागतात. चिंब चिंब भिजवणारे आणि कधी कधी प्रवाहात ढकलून देणारे. पोहता येतं की नाही, हे ही कुणाला बोलून ठेवलेलं असेल तर बरं असतं. नसेल पोहता येत तर कुणीतरी मदतीचा हात तरी पुढे करणार ना! मदतीसाठी हाक मारायलाही बोलता यायला हवं. 
बोलता आलं पाहिजे प्रत्येकाला. ज्या समाजात जगतो त्याच्या उण्या-दुण्याबद्दल बोलता यावं. असं उणं-दुणं काढण्याची परवानगी समाजात आहे कि नाही, हे ही बोलून दाखवता यावं. अधिकारांची भाषाही कळायला हवी आणि जबाबदारीचा सूरही लावता यावा. शब्दांची जोड यालाही असतेच. योग्य शब्द निवडता यावे आणि ते कुठे आणि कसे वापरावे हेही मनाला आणि बुद्धीला बोलून दाखवता यावं. म्हणजे कंठालाही योग्य जोडीदार मिळाल्याचं समाधान मिळेल. 
बोलावं जरूर प्रत्येकानं. कारण नाही बोललं तर विचार डोक्याला भंडावून सोडतील आणि मग भंडावलेलं डोकं फुटण्याची पाळी येईल. म्हणून बोलावं माणसानं. भडभडा बोलून मोकळं व्हावं. कधी प्रत्यक्ष बोलावं. कधी फोन वरून बोलावं. कृतीतून बोलावं, इशाऱ्याने बोलावं, कवितेतून बोलावं, चित्रातून बोलावं, गाण्यातून बोलावं, स्वयंपाकातून बोलावं, मेंदीतून संवाद साधावा तर कधी रांगोळीतून व्यक्त व्हावं. 
आणि कधी कधी काहीच न बोलता शांतातेतूनही बोलावं… 
पण बोलावं. कारण बोलायचं असतं. प्रत्येकाला. संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाशी. 

वर्षा वेलणकर 

Friday, March 7, 2014

"या शहरात आलं की आठवणींचं अगदी मोहळ उठतं… रोज मोठ्या हिकमतीन विरजण लावलेली साय जोरात घुसळावी आणि लोण्याचा गोळा वर तरंगावा तसं काहीतरी घडतं. लोण्यासारखी मऊशार आणि तरीही घट्ट नाती डोळ्यासमोर दिसतात. जीव टाकणारी माणसं दिसतात आणि जीव डोळ्यात गोळा  होतो."
किती पुस्तकी प्रतिक्रिया, म्हणून हसतील सगळे. पण वाटलं तेच आणि तसंच ओठावर आलं तर काय बिघडतं?  पोटात तेच ओठात, असं  असू नये का? पण विराजणातून वर येणाऱ्या लोण्याबद्दल लिहिताना खाली राहिलेल्या ताकाचा आणि त्याच्या पातळ असण्याचा उल्लेख अगदी मनापासून आला तरी लिहू शकते का मी? की टाळावं लागेल ते मला? कुणी दुखवू नये किव्वा कुणाला मुद्दाम दुखवू नये हे देखील पुस्तकातच वाचलंय. मग लिहिताना पुस्तकांना प्रमाण मानूनच लिखाण करावं लागेल. की मनापासून येणारी उर्मी जोपासू?
पुन्हा प्रश्नांच्या जंगलाचा एक प्रवास!
वर्षा वेलणकर 

Thursday, February 13, 2014

तलाश


तलाश 

एक रिश्ता बुना तुमसे, 
रेशमके धागे से   
सपना था या हक़ीक़त, 
सोये थे हम या जागे थे?

रिश्ता वो जो बुना था तुमसे 
ये दौर तभीसे चला है 
कोशीश लाख़ कि है मैंने 
पर अब पता चला हैं 

उस रिश्ते का ताना-बाना  
लफ्जोंसे उसका जोड़ लगाना 
काम कोई आसान नहीं 

इसीलिए कुछ किताबोंसे
और सितारोंसे जड़े ख्वाबोंसे 
कुछ लफ्ज उधार लिए हैं मैंने
 
क्योँकि बयाँ करनी हैं 
तुमसे जुड़ी बातें सारी 
थोड़ी अपनीसी है 
बाकी बस सिर्फ तुम्हारी 

पर उधार लफ्जों में वो बात कहा? 
हमनें देखें हैं जो दौर 
वैसे किसीके हालात कहाँ?

वो जो कहनी है दास्ताँ 
वो सिर्फ़ हमारी हैं 
बयां करने वो कहानी 
अभी लफ्ज़ो कि तलाश जारी हैं 

वर्षा वेलणकर 

Sunday, February 9, 2014

माझ्या 'आदर्श' शिक्षिका

मार्च महिना आणि १९ तारीख!  माझा वाढदिवस आणि नेमका त्यादिवशी दहावी बोर्डाचा पेपर! मला अभ्यास आणि परीक्षांचा तिटकारा आहे. चोवीस वर्षांपूर्वी माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच असलेल्या पेपरमुळे त्यात आणखी भर पडली होती. पण माझा तो वाढदिवस मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही ते एका व्यक्तीमुळे. माझ्या शिक्षिका रेखा फडणवीस यांच्यामुळे. पेपर सुरु होणार तेवढ्यात शाळेतल्याच एक इतर शिक्षिका आल्या आणि त्यांनी हातात एक कार्ड ठेवलं. शेकडो विद्यार्थिनी ज्यांच्या हाताखाली शिकून दरवर्षी निघून जातात त्या शिक्षकाने आपला वाढदिवस लक्षातच ठेवला नाही तर कार्डही पाठवावं, हे स्पेशल नाही का? मला आजही तो क्षण आठवतो आणि आठवतात माझ्या रेखा मॅडम. आणि हे सगळं स्पेशल यासाठी की मी स्पेशल नव्हते. मी कधीच एक खूप हुशार विद्यार्थिनी नव्हते. पण मला त्या अतीसामान्य असण्याच्या भावनेतून बाहेर काढून एक थोडंसं वेगळं आयुष्य जगायला शिकवलं ते रेखा मॅडम यांनी आणि म्हणून त्या माझ्या आयुष्यात कोरल्या गेल्या आहेत. 
घरी आई आणि शाळेतल्या बाई, एवढंच महत्वाचं असलेल्या वयाच्या टप्प्यावर मला रेखा मॅडम भेटल्या. खूप प्रसन्न चेहरा आणि कायम उत्साहाने प्रत्येक काम करणाऱ्या या मॅडम आमच्या प्रत्येकाच्या आवडीच्या होत्या. मग त्यांना फुलं आणणं आणि ते त्यांनी खूप हौसेनं केसात माळणं जितकं प्रेमळ होतं तितकंच त्यांचं विद्यार्थ्यांना हाताळणंही प्रेमळ होतं. पण त्यांनी कधी कुणाचे अवाजवी लाडही केले नाही. चुकांना त्यांच्याकडे माफी नव्हती. अभ्यासात कसूर केलेली त्यांना कधीच चाललं नाही. पण म्हणून त्यांनी कधी त्याचा खूप बाऊही केला नाही. वर्गात सगळ्यांना शिक्षा झाली आहे किव्वा जोरात ओरडून कुठली गोष्टं पटवून देण्याचा प्रयत्न त्या करताहेत असं कधीच झालं नाही. त्यांच्या विषयात चांगले मार्कं मिळावे ही धडपड त्यांनी त्यांच्या या विशेष स्वभावातून आमच्यात रुजवली. 
शाळा सुटली आणि वय वाढल्यावर आलेल्या जराश्या शहाणपणातून आता कळतंय की त्यांचा विषय होता एक चांगलं व्यक्तिमत्व घडवणं. खूप भव्य दिव्य काही करण्यापेक्षा फक्त एक चांगलं माणूस म्हणून आपले विद्यार्थी ओळखले जावेत, हे त्यांचं शिक्षण होतं आणि फक्त माझ्यासंदर्भात सांगायचं झालं तर ते आजही त्यांच्या हातून घडतंय. दहावी नंतर माझी शाळा सुटली पण मॅडमशी जुळलेली नाळ कायम राहीली. कॉलेजच्या अनिर्बंध वातावरणातही पाय जमिनीवर ठेवण्याचा संस्कार त्यांनी कधी रुजवला मला कळलंही नाही. नोकरी मिळाल्यानंतर ती करताना शंभर टक्के मेहनत करण्याची शिकवण त्यांनी शब्दातून नाही तर त्यांच्या स्वतःच्या कृतीतून पोचवली. काहीही अडचण आली आणि त्यांना ती पत्रातून कळवली की त्यांनी ती उत्तरातून सोडवली म्हणून समजा. ते ही सामान्यतः शिक्षक ज्या अधिकारानं सांगतात तसे नाहीच. त्यांच्यात आम्हाला एक मैत्रिण सापडली होती. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर येणाऱ्या भावनावेगांना समजून घेणारी, अंगी असलेल्या छोट्याश्या का होईना पण गुणांना प्रोत्साहन देऊन त्याचा आयुष्यात कुठे आणि कसा वापर करता येईल हे हळूच मनावर बिंबवणारी अशी ही वयानं, आदरानं मोठी असलेली मैत्रिण! वयाचा मोठेपणा आणि आदरयुक्त भीती त्यांनी आमच्या मनात निर्माण होऊ दिली नाही. एक आदर्श शिक्षक याहून वेगळा काय असणार! 
चोवीस वर्ष झालीत पण आजही मॅडमचं माझ्या आयुष्यातील स्थान कायम आहे. पत्रकारिता सोडल्यानंतर काहीतरी वेगळं करायचं डोक्यात होतं. मला मॅडमच्या रुपात मिळालेल्या मैत्रिणीमुळे आयुष्य सुकर करता आलं तशीच कुणाचीतरी आपणही मैत्रिण व्हावं, असा विचार आला आणि मॅडमने माझं तेही स्वप्न पूर्ण केलं. एका शतकपूर्ती करणाऱ्या शाळेत त्या मुख्याध्यापिका आहेत आणि तिथेच त्यांनी मला माझ्या छोट्या मैत्रिणींशी गप्पा करण्याची संधी दिली. पुन्हा मला शाळा अनुभवता आली आणि पुन्हा त्यांच्या आदर्श वर्तणुकीला जवळून पाहता आलं. त्यांचा प्रसन्न चेहरा आजही तितकाच प्रसन्न आहे आणि कामाचा उत्साहही. एक कुशल प्रशासक त्या आहेत मात्र त्यांच्या शिक्षकांच्या टीममध्ये खूप पॉपुलर आहेत. आजही त्या जे काही शिकवतात ते त्यांच्या कृतीतून. मग तो नीटनेटकेपणा असो की वाचनाची आवश्यकता. नवीन काही शिकण्याचा उत्साह असो किव्वा शिकवण्याची हौस. अशात त्यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित झाल्यानंतर झालेला आनंद व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे आहेत. त्या आहेतच आदर्श शिक्षिका. फक्त आता त्यावर पुरस्काराची मोहर लागली आहे. 

वर्षा वेलणकर

Monday, February 3, 2014


प्रीती लिमसे-शाह ये तुम्हारे लिए. 


दिन, महीने, साल बढ़ी उम्र कि परते उठाई  
तो दिल के कोनेमें पड़ी हुई इक चीज़ नजर आई 

मैं हैरान, दिल तो ख़ाली पड़ा था सालोंसे 
नहीं किसी का आना-जाना,
दरवाज़े सारे बंद रखें थे तालोंसे

हाथ बढ़ाकर उसे टटोला, और एक आवाज लगाई 
जान थी उसमें, नजर उठाके वो मुस्काई 

"बचपन नाम है मेरा, साथ तुम्हारे जन्मी थी  
मुझे उठालो और संभालो, मैं तुम्हारी अपनी थी"

बचपन का थामा हाथ तो टूटें सारें ताले 
ख़ुल गए दरवाज़े, 
अब दिलमें यादोंके सतरंगी मेले 

वर्षा वेलणकर