Thursday, February 13, 2014

तलाश


तलाश 

एक रिश्ता बुना तुमसे, 
रेशमके धागे से   
सपना था या हक़ीक़त, 
सोये थे हम या जागे थे?

रिश्ता वो जो बुना था तुमसे 
ये दौर तभीसे चला है 
कोशीश लाख़ कि है मैंने 
पर अब पता चला हैं 

उस रिश्ते का ताना-बाना  
लफ्जोंसे उसका जोड़ लगाना 
काम कोई आसान नहीं 

इसीलिए कुछ किताबोंसे
और सितारोंसे जड़े ख्वाबोंसे 
कुछ लफ्ज उधार लिए हैं मैंने
 
क्योँकि बयाँ करनी हैं 
तुमसे जुड़ी बातें सारी 
थोड़ी अपनीसी है 
बाकी बस सिर्फ तुम्हारी 

पर उधार लफ्जों में वो बात कहा? 
हमनें देखें हैं जो दौर 
वैसे किसीके हालात कहाँ?

वो जो कहनी है दास्ताँ 
वो सिर्फ़ हमारी हैं 
बयां करने वो कहानी 
अभी लफ्ज़ो कि तलाश जारी हैं 

वर्षा वेलणकर 

Sunday, February 9, 2014

माझ्या 'आदर्श' शिक्षिका

मार्च महिना आणि १९ तारीख!  माझा वाढदिवस आणि नेमका त्यादिवशी दहावी बोर्डाचा पेपर! मला अभ्यास आणि परीक्षांचा तिटकारा आहे. चोवीस वर्षांपूर्वी माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच असलेल्या पेपरमुळे त्यात आणखी भर पडली होती. पण माझा तो वाढदिवस मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही ते एका व्यक्तीमुळे. माझ्या शिक्षिका रेखा फडणवीस यांच्यामुळे. पेपर सुरु होणार तेवढ्यात शाळेतल्याच एक इतर शिक्षिका आल्या आणि त्यांनी हातात एक कार्ड ठेवलं. शेकडो विद्यार्थिनी ज्यांच्या हाताखाली शिकून दरवर्षी निघून जातात त्या शिक्षकाने आपला वाढदिवस लक्षातच ठेवला नाही तर कार्डही पाठवावं, हे स्पेशल नाही का? मला आजही तो क्षण आठवतो आणि आठवतात माझ्या रेखा मॅडम. आणि हे सगळं स्पेशल यासाठी की मी स्पेशल नव्हते. मी कधीच एक खूप हुशार विद्यार्थिनी नव्हते. पण मला त्या अतीसामान्य असण्याच्या भावनेतून बाहेर काढून एक थोडंसं वेगळं आयुष्य जगायला शिकवलं ते रेखा मॅडम यांनी आणि म्हणून त्या माझ्या आयुष्यात कोरल्या गेल्या आहेत. 
घरी आई आणि शाळेतल्या बाई, एवढंच महत्वाचं असलेल्या वयाच्या टप्प्यावर मला रेखा मॅडम भेटल्या. खूप प्रसन्न चेहरा आणि कायम उत्साहाने प्रत्येक काम करणाऱ्या या मॅडम आमच्या प्रत्येकाच्या आवडीच्या होत्या. मग त्यांना फुलं आणणं आणि ते त्यांनी खूप हौसेनं केसात माळणं जितकं प्रेमळ होतं तितकंच त्यांचं विद्यार्थ्यांना हाताळणंही प्रेमळ होतं. पण त्यांनी कधी कुणाचे अवाजवी लाडही केले नाही. चुकांना त्यांच्याकडे माफी नव्हती. अभ्यासात कसूर केलेली त्यांना कधीच चाललं नाही. पण म्हणून त्यांनी कधी त्याचा खूप बाऊही केला नाही. वर्गात सगळ्यांना शिक्षा झाली आहे किव्वा जोरात ओरडून कुठली गोष्टं पटवून देण्याचा प्रयत्न त्या करताहेत असं कधीच झालं नाही. त्यांच्या विषयात चांगले मार्कं मिळावे ही धडपड त्यांनी त्यांच्या या विशेष स्वभावातून आमच्यात रुजवली. 
शाळा सुटली आणि वय वाढल्यावर आलेल्या जराश्या शहाणपणातून आता कळतंय की त्यांचा विषय होता एक चांगलं व्यक्तिमत्व घडवणं. खूप भव्य दिव्य काही करण्यापेक्षा फक्त एक चांगलं माणूस म्हणून आपले विद्यार्थी ओळखले जावेत, हे त्यांचं शिक्षण होतं आणि फक्त माझ्यासंदर्भात सांगायचं झालं तर ते आजही त्यांच्या हातून घडतंय. दहावी नंतर माझी शाळा सुटली पण मॅडमशी जुळलेली नाळ कायम राहीली. कॉलेजच्या अनिर्बंध वातावरणातही पाय जमिनीवर ठेवण्याचा संस्कार त्यांनी कधी रुजवला मला कळलंही नाही. नोकरी मिळाल्यानंतर ती करताना शंभर टक्के मेहनत करण्याची शिकवण त्यांनी शब्दातून नाही तर त्यांच्या स्वतःच्या कृतीतून पोचवली. काहीही अडचण आली आणि त्यांना ती पत्रातून कळवली की त्यांनी ती उत्तरातून सोडवली म्हणून समजा. ते ही सामान्यतः शिक्षक ज्या अधिकारानं सांगतात तसे नाहीच. त्यांच्यात आम्हाला एक मैत्रिण सापडली होती. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर येणाऱ्या भावनावेगांना समजून घेणारी, अंगी असलेल्या छोट्याश्या का होईना पण गुणांना प्रोत्साहन देऊन त्याचा आयुष्यात कुठे आणि कसा वापर करता येईल हे हळूच मनावर बिंबवणारी अशी ही वयानं, आदरानं मोठी असलेली मैत्रिण! वयाचा मोठेपणा आणि आदरयुक्त भीती त्यांनी आमच्या मनात निर्माण होऊ दिली नाही. एक आदर्श शिक्षक याहून वेगळा काय असणार! 
चोवीस वर्ष झालीत पण आजही मॅडमचं माझ्या आयुष्यातील स्थान कायम आहे. पत्रकारिता सोडल्यानंतर काहीतरी वेगळं करायचं डोक्यात होतं. मला मॅडमच्या रुपात मिळालेल्या मैत्रिणीमुळे आयुष्य सुकर करता आलं तशीच कुणाचीतरी आपणही मैत्रिण व्हावं, असा विचार आला आणि मॅडमने माझं तेही स्वप्न पूर्ण केलं. एका शतकपूर्ती करणाऱ्या शाळेत त्या मुख्याध्यापिका आहेत आणि तिथेच त्यांनी मला माझ्या छोट्या मैत्रिणींशी गप्पा करण्याची संधी दिली. पुन्हा मला शाळा अनुभवता आली आणि पुन्हा त्यांच्या आदर्श वर्तणुकीला जवळून पाहता आलं. त्यांचा प्रसन्न चेहरा आजही तितकाच प्रसन्न आहे आणि कामाचा उत्साहही. एक कुशल प्रशासक त्या आहेत मात्र त्यांच्या शिक्षकांच्या टीममध्ये खूप पॉपुलर आहेत. आजही त्या जे काही शिकवतात ते त्यांच्या कृतीतून. मग तो नीटनेटकेपणा असो की वाचनाची आवश्यकता. नवीन काही शिकण्याचा उत्साह असो किव्वा शिकवण्याची हौस. अशात त्यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित झाल्यानंतर झालेला आनंद व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे आहेत. त्या आहेतच आदर्श शिक्षिका. फक्त आता त्यावर पुरस्काराची मोहर लागली आहे. 

वर्षा वेलणकर

Monday, February 3, 2014


प्रीती लिमसे-शाह ये तुम्हारे लिए. 


दिन, महीने, साल बढ़ी उम्र कि परते उठाई  
तो दिल के कोनेमें पड़ी हुई इक चीज़ नजर आई 

मैं हैरान, दिल तो ख़ाली पड़ा था सालोंसे 
नहीं किसी का आना-जाना,
दरवाज़े सारे बंद रखें थे तालोंसे

हाथ बढ़ाकर उसे टटोला, और एक आवाज लगाई 
जान थी उसमें, नजर उठाके वो मुस्काई 

"बचपन नाम है मेरा, साथ तुम्हारे जन्मी थी  
मुझे उठालो और संभालो, मैं तुम्हारी अपनी थी"

बचपन का थामा हाथ तो टूटें सारें ताले 
ख़ुल गए दरवाज़े, 
अब दिलमें यादोंके सतरंगी मेले 

वर्षा वेलणकर    

Sunday, January 26, 2014

शाम


शाम 

शाम कुछ इस तरहसे आंगनमें उतरती है मेरे 
माँ कि लोरी सुनकर 
नींदसे बोझिल पलकोंको बरबस उठाकर 
मुस्कुराते नन्हें बच्चे कि तरहा 
शाम कुछ इस तरहसे आंगनमें उतरती है मेरे

शाम कुछ इस तरहसे आंगनमें उतरती है मेरे
पत्तों कि झुरमुटसे सुनरहरी किरणे बिखेरतीं 
जैसे गालों को सेहलाती हुई  
नानीकी झुर्रियों भरी हथेलियाँ 
शाम कुछ इस तरहसे आंगनमें उतरती है मेरे

शाम कुछ इस तरहसे आंगनमें उतरती है मेरे
दिनभर उम्र काँटकर बुजुर्ग हुए सूरज कि तरहा 
जिंदगीकी सच्चाई को हवा के झोंकेमें पिरोकर 
कानोंमे बुदबुदाती हुई 
शाम कुछ इस तरहसे आंगनमें उतरती है मेरे

वर्षा वेलणकर 

Thursday, January 9, 2014

डायरीचे एक पान…


डायरीचे एक पान… 

जून २४, २०१२

पावसानं रात्री जोर धरला आहे…  अशात, डोळे मिटून फक्त पडून राहणं शक्य असतं? शक्य नाही… पहाटेपासूनच ढगांनी आसमंत आणि सारा परीसर झाकोळून टाकला आहे…  फक्त ओलावा घेऊन निसर्ग पुढ्यात उभा ठाकलेला… सतत एकच जाणीव… अजून खूप काही दडलंय आत आणि देर आहे ती  बरसायची… रात्र कदाचित त्यासाठीच राखून ठेवली गेली असेल… 
हॉटेलच्या खिडकीमागे दाट झाडी असल्यानं पावसाचा बरसण्याचा नूर आणि स्वर वेगळा आहे. त्यात पानांची सळसळ आणि झाडांमध्ये वाहत्या वाऱ्याचा आवाज…खिडकीचा पडदा बाजूला सारून जरा डोकावून पाहिलं तर अचानक झाडाची एक फांदी वाऱ्याच्या ओघात काळोखातून खिडकीकडे झेपावली. दचकायला झालं. निसर्गाच्या इतर रूपांचा आस्वाद घेताना आनंद होतो. मग रौद्र रूपाचं भय का वाटावं? प्रश्न…त्यात  झाडातून वाहणाऱ्या वाऱ्याचं घोंघावणं मिसळलं आणि 'भय' या शब्दाचं वजन आणखी गडद झाल्याचं जाणवलं. 
सगळीच सरमिसळ…थोडा उत्साह…थोडा आनंद…थोडं स्तिमित होणं…थोडा विचार आणि खूप सारा अविचारही…थोडं त्यात उदासलेपण देखील डोकावतं…इथे येतानाच पावसानं घाटात गाठलं. मान्सून जेमतेम सुरु झाला असताना डोंगराकडे धाव घेणं म्हणजेच पाऊस अंगावर झेलण्याची इच्छा अनावर होणं, नाही का? मग घाटातच त्यानं गाठलं तर आनंद होणारच! डोंगर माथ्याशी पोचेपर्यंत धूक्यात वाटही दिसेनाशी झाली. अपेक्षा होती तसाच मौसम… अमाप आनंद…पण गडद धुक्याची भीतीही दाटून आली मनात. सगळीच भावनांची सरमिसळ… 
थोडं शांत बसण्याचा प्रयत्न करतानाच अचानक वाऱ्याची झुळूक यावी तसे विचार छळतात. त्याला छळ तरी कसं म्हणायचं? डोकं आहे, बुद्धी आहे तर मग विचार येणारच ना! विचार छळतात असं म्हणणं किती नकारात्मक वाटतं! पण का? 'का'चा विचार केला तर लक्षात येतं, मनाविरुद्ध आहेत किंवा आलेल्या विचारातून निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही म्हणून त्याचा त्रास होतो. मनाविरुद्ध आहेत खरे, आणि कदाचित अनुत्तरीतही असतील. पण म्हणून त्यांना वाईट म्हणायचं? पुन्हा एकप्रश्न. या प्रश्नांचा आता निकाल लावायलाच हवा. तात्विक किंवा सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जरा तत्वज्ञानाकडे जाणारा विचार केला तर मला वाटतं, का शोधायचं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर? काय गरज आहे त्याची? राहिलं काहीतरी अनुत्तरीत तर बिघडतं का काही? 
दैनंदिन आयुष्याशी निगडीत असतील तर  प्रश्न सोडवायलाच हवे. गरजच आहे ती. त्यातही दैनंदिन आयुष्यात ज्या लोकांशी नाळ जुळली आहे त्यांच्यासाठीच्या प्रश्नांची उत्तरं मिळवायलाच हवी. नातं सुख घेऊन आलेलं असेल आणि तरीही त्याबाबत काही प्रश्न निर्माण झालेले असतील तर ते नातं आणखी समजून घेण्यासाठी संबंधित सर्व प्रश्न सोडवण्याची गरज आहे. नात्यात तणाव निर्माण करणारा प्रश्न असेल तर मग तातडीनं सोडवावा. नाहीतर गुंता वाढतंच जाणार हे निश्चित. 
पण सगळीच सरमिसळ आहे खरी. त्याला गुंतागुंत म्हटलं तर ती प्राधान्यानं सोडवायला हवी. कारण काही गाठींची उकल फार फार आवश्यक असते. पण ती फक्त सरमिसळ असेल तर त्याचा हळुवार आनंद घेत प्रत्येक भावना आणखी खोलवर उतरून पाहण्याचा प्रयत्न व्हावा. डोंगरावरच्या या सुखद वातावरणात हा साक्षात्कार व्हावा, याहून समाधान देणारं काय असेल? 
खूप उंच आहे म्हणून वाहणाऱ्या ढगांना रोखण्याची ताकद डोंगरात आहे. इतकी उंची गाठली आहे त्यानं की ढगांनाही पायाशी लोळण घ्यायला लावतो तो. निसर्गातली सगळी सुबत्ता खेचून घेतली आहे त्यानं स्वतःकडे. पण सारंच काही त्याच्या मर्जी प्रमाणे नाही. त्याला संपूर्ण शरण जाणं आकाशानही सहज स्वीकारलेलं नाही. ढगांमध्ये डोंगरमाथे गुडूप होतातच ना! उंच उंच होण्यालाही शिक्षा असते का? वर आणि आणखी वर गेल्यावर आपलं अस्तित्वही कदाचित गुडूप होऊ शकतं, अशी मानसिक तयारी त्यालाही करावी लागत असेल, नाही? 
यशाची शिखरं पादाक्रांत करणाऱ्यांनाही हे असंच काहीसं अनुभवाव लागत असेल? तेही उंची गाठतात. सर्व प्रकारच्या ऐशोआरमाला पायाशी लोळण घ्यायला लावायची ताकद तेही मिळवतात. यशाबरोबर लोकप्रियताही येते. आणखी काय काय अनुभव घेत असेल अशी यशस्वी व्यक्ती? त्याच्या नशिबाचे भोग असतात तरी काय? सारं काही चांगलंच होतं का त्याच्या आयुष्यात? आणि तो हि सर्वार्थाने इतरांसाठी चांगलाच ठरतो का? 
डोक्यात प्रश्नांचे ढग दाटून आलेले आणि नजर खिळली आहे डोंगरावर. उंच डोंगरावर. 
एक वाऱ्याची झुळूक येते आणि ढगांच्या हातात हात घालून पुढे निघते. डोंगर दिसतो स्पष्ट. त्याच्या अंगाखांद्यावर खेळणारी छोटी-मोठी हिरवीगार झाडं दिसतात आणि दिसतात त्या डोंगरातील कपाऱ्या. सपाट, सरळ दरीत उतरणाऱ्या. डोंगरमाथा आणि त्याचं टोक आणि मग ती कपार. सरळ दरीत उतरणारी. 
डोंगर खुणावतात सामान्यांना. त्याचं सौंदर्य खिळवून टाकणारं असतं. म्हणूनच पावलं आपसूक तिकडे वळतात. स्वतःला रोखणं अशक्य असतं. पायाखालची वाट खेचत असते. पुढे, पुढे आणि आणखी पुढे. पार त्या शेवटच्या टोकापर्यंत. कपार नजरेच्या टप्प्यात नसते. असतं ते फक्त  सौंदर्य आणि इतर खूप काही. शिखारावरची सत्ता, मनाचं त्यावर अधिराज्य, भावनांचा बहर फक्त दिसतो. अशात फक्त पुढे पुढे चालण्याची उर्मी ढगांप्रमाणे दाटून येते. डोंगराचा शेवटचा टप्पा पादाक्रांत करायची उर्मी. स्वस्थ बसू देत नाही ती. मनाला आणि पायांनाही. पावसानं पायवाट निसरडी झालेली आहे आणि चिखलानं पाय फक्त माखलेच नाहीत तर काही ठिकाणी रुतून बसताहेत याचंही भान उरत नाही. फक्त त्या शेवटाची, त्या उंचीची ओढ लागली असते. 
शेवटी तो टप्पा दृष्टीपथात येतो. मनाची तिथे पोचण्याची ओढ पायांना वेग पुरवते. मन धावू लागतं आणि पाय त्याचं अनुकरण करतात. निसरड्या वाटेवर पाय ठरत नाहीत. पण वेगाला आवर घालणंही कठीण होऊन बसतं. फक्त आणखी काही पावलं आणि तो पहा आलाच शेवटचा टप्पा…श्वास फुललेला आणि पाय आसुसलेले…डोळ्यात आणि मनात अत्युच्यतेला स्पर्श करण्याचा आवेग…त्या अनुभवास आता फक्त काही क्षण उरलेले…अपेक्षांची पूर्तता करण्याची सर्व ताकद  मनात आणि मनातून पायांत आलेली…बस्स! हा आलाच तो क्षण!! आता तिथे पोचताच थांबायचं आणि फक्त आनंद लुटायचा. त्या टोकावर थांबायचं. डोळे सांगत असतात थांबायला. मनाला पटतं आणि पायांनाही कळलेलं असतं. पण पायाखालच्या वाटेला कसं कळणार हे सारं? पावसात चिंब भिजलेली, मनसोक्त न्हालेली ती आवरणार तरी कशी स्वतःला! पावलांना रोखण्याची जबाबदारी तिची नाही. ती फक्त पुढे नेणारी असते. मग ती जर कड्यापर्यंत जाणारी आणि तिथेच संपणारी असेल तरीही हा खुलासा तिच्या आधारानं चालणाऱ्याकडे करण्याची जबाबदारी तिची नाहीच. ती फक्त घेऊन जाणारी. तिच्या अंताशी चिखलानं माखलेल्या पायांना थांबता आलं नाही, आवरता आला नाही तर अशा पावलांच्या कडेलोटाची जबाबदारी तिची कशी? 
उंच डोंगर, हिरवागार साज, पावसाची मेहरबान नजर, घोंगावणारा वारा आणि मनातील भावनांची सरमिसळ! शिखराकडे कूच केलेल्या पावलांना हे सारं काही सांभाळता आलं पाहिजे. नाहितर…
धुक्यात एकतर काहीच स्पष्ट दिसत नाही आणि अशात भावनांची ही सरमिसळ… 

वर्षा वेलणकर 

Tuesday, January 7, 2014

ख़ुशी का गांव


ख़ुशी का गांव 

ज़िन्दगी मे एक दिन ऐसा आया
सूरज ने ख़ुशी का पता बताया
हमने उसका हाथ थामकर
और किरणोकी पगडंडीपर चलकर
एक एक कर कदम बढाया
जैसे जैसे दिन बढ़ा
सूरज पूरा परवान चढ़ा
हुआ मन मे सवाल खड़ा
क्या सचमुच इसने सच है कहा?
मै मुरख तो नहीं, इसकी बातोंमे बहा?
अगर है इसे मुझसे सच्चा प्यार
तो कहा है इसमे अपनेपन की फुहार?
क्यों है जलाता और तड़पाता?
क्यों नहीं ख़ुशी के घर ले जाता?
मै झल्लाया, चिढ़कर उससे हाथ छुड़ाया
किरणोकी राहोंसे हटकर
जा बैठा एक वृक्ष की छाया
वहा बड़ा आराम मिला
जलते तन का ताप ढला
लेकर चैनसे एक जम्हाई
थोडीसी पलकें झपकाई
नींद दबे पाँवसे आकर
सिरहाने आकर इतराई
बोली, मुझे पता है ख़ुशी का घर
चल मेरा हाथ पकड़
जाना है सपनोंके गाँव
बैठ जा निंदकी नाव
ना कोई तड़प, ना कोई जलन
वहा मिलेगी प्रेमकी छाव
नींद का जादू ऐसा छाया
मुझको उसने ऐसा भरमाया
मै भुला सूरज का साथ
और कही थी उसने जो बात
नींद का जादू और गहराया
उसने सूरजसे साथ छुड़वाया
भरम, सपनोका जाल डालकर
सच्चाईको  दूर भगाया
पर किस्मत मेरी अच्छी थी
नियत सूरज की सच्ची थी
पत्तोंको थोडासा हटाकर
ढलते ढलते मुझसे मिलने आया
कहा, जाग जा मुसाफिर
दूर अभी तेरी है मंजिल
अगर ख़ुशी के घर है जाना
थक-हार के नहीं बैठना
मै कल फिर आऊंगा
साथ तुझे ले जाऊंगा
हा थोडा दूर है खुशीका गाँव
डगर मुश्किल, नहीं कोई छाव
पर मै और सच्चाई साथ तुम्हारे
तो काहेको घबराना प्यारे
चल चला चल बढ़ता जा
वो देख वहा ख़ुशी का गाँव

वर्षा वेलणकर 

Sunday, December 29, 2013

___________

प्रिय निरंजन,

२२ ऑगस्ट… बरोबर चार महिने झालेत आणि अजूनही या तारखेनंतर जे काही घडले त्या घटनांवर मी माझी प्रतिक्रिया शोधते आहे. एकटीच घरात शांत बसले असताना दारावरची बेल वाजावी आणि दार उघडल्यावर थबकायला व्हावं. प्रचंड प्रकाश! इतका की जे काही त्यात उभं होतं ते काहीही दिसूच नये. साध्या आकृतीचाही अंदाज बांधता येऊ नये इतका प्रकाश! आणि काही क्षणातच त्या प्रकाशासकट सारं काही गुडूप व्हावं. मी अजूनही माझी  प्रतिक्रिया शोधते आहे.  
साधा ताप तर होता. पूर्वी काही शारीरिक त्रासांनी एक वर्षापूर्वी त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली होती. पण त्याचं स्वरूप इतकं गंभीर असेल असं वाटलं नव्हतं. ताप तीन दिवस राहिला आणि चवथ्या दिवशीही जेव्हा उतरला नाही तेव्हा मात्र थोडं अस्वस्थ वाटलं. आम्हाला दोघांनाही. मग डॉक्टर आणि वेगवेगळ्या टेस्ट झाल्या. तुमच्या हाती फारसा वेळ नाही, लगेच हॉस्पिटलला भरती व्हा, हे त्याचं वाक्य ऐकून माझी प्रचंड चिडचिड झाली. पण काहीच पर्याय नव्हता. संध्याकाळ संपली होती. रात्र जनरल वार्ड मध्ये काढायची होती. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा सगळ्या चाचण्या झाल्या आणि दुपारी माझी रवानगी थेट आसीयूमधेच झाली. ती रात्र खूप अस्वस्थतेत गेली. पण एक दोन दिवसात इथून नक्की सुटका होणार याची खात्री होती म्हणून एक प्रकारचा निश्चिंतपणा मनात होता. 
पण तसं झालं नाही. दुसऱ्यादिवशी जेव्हा एन्डोस्कोपीसाठी मला नेण्यात आलं त्यानंतर सगळं चित्रंच बदललं. मी बेशुद्ध झाले होते आणि शुद्ध आल्यावर मग कसलीशी ग्लानी होती. काहीच कळत नव्हतं. सारे जीवाभावाचे लोक जमले होते आणि मला मात्र कसलंच भान राहिलं नव्हतं. एकप्रकारच्या शांततेनं मनात ताबा घेतला होता आणि मी खूप खूप… मला नाही सांगता येत कि नेमकं त्यावेळी मनात काय घडत होतं. पण जे होतं ते अनाकलनीय होतं. जमिनीवरून अलगद उचलले जाण्यापासून ते प्रखर प्रकाशापर्यन्तचा तो प्रवास होता. त्यात जे दिसलं, मी पाहिलं, अनुभवलं ते व्यक्त करायला शब्द नाहीत माझ्याकडे. पण ते जे काही होतं  त्यानंतरची मी मात्र पूर्ण वेगळी आहे. 
सहा दिवस आयसीयु आणि नंतर सात दिवस मी हॉस्पिटलच्या खोलीत होते. शारीरिक जे काही घडलं होतं ते डॉक्टरांनी शब्दांत सांगितलं. उपचारासाठी जे काही करावं लागत होतं ते ही काहीवेळा सहनशक्तीची परीक्षा घेणारं होतं आणि मी ही डोळ्यात पाणी आणून आणि काहीवेळा कळवळून त्यावर प्रतिक्रियाही व्यक्त केलीच.घरी परत आल्यावर पुन्हा तीन आठवड्यांनी भरती व्हावं लागलं आणि मग एक ऑपरेशनहि झालं. त्रास झाला. माझ्यापेक्षाही माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांना तो जास्त झाला. म्हणून मी जे झालं त्यावर अजूनही माझी प्रतिक्रिया शोधते आहे.
मला मागे वळून पाहायचे नाही. त्यामुळे माझ्या आजारपणासाठी काय जबाबदार होतं; मी की ज्या परिस्थितीत मी जगले ती; माझा स्वभाव की जगण्याची पद्धत की आणखी काही. मला या प्रश्नांची उत्तरच शोधायची नाहीत. पण जे झालं त्यानंतर मला आता काय वाटतं आहे, ते मात्र मी नमूद करणार आहे. जो त्रास झाला तो मी विसरू शकत नाही पण त्याच बरोबर मला एक मात्र जाणवतं आहे की त्याहीपेक्षा आणखी काही लक्षात राहण्यासारखं या पूर्ण आजारपणाच्या दिवसांमध्ये होतं.
परिस्थिती एक होती आणि तिला हाताळणारे अनेक होते. डॉक्टर, नर्सेस आणि नातेवाईक. प्रत्येकाचा परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा होता. पण त्यांच्या प्रत्येक कृतीची साक्षीदार फक्त मी एकटी होते. डॉक्टर आणि नर्सेसच्या कामाचा तो एक भाग होता, असं सहज म्हणता येईल. पण त्यातही रुटीनच्या पलीकडे जाणारे मला त्यांच्यात भेटले. माझ्या बिछान्याशी येउन उभ्या राहणाऱ्या माझ्या लोकांचे अव्यक्त प्रेम मला दिसले. फक्त काही दिवसांपूर्वी झालेल्या मैत्रीचं रुपांतर नात्यात होताना दिसलं. आणि आयुष्यभर सोबत करण्यासाठी ज्या व्यक्तीला मी निवडलं होतं त्यानं त्या ७२ तासात मला खेचून बाहेर आणण्यासाठी धरलेला हात दिसला.
चार महिने लोटले आहेत. काय लक्षात ठेवायला हवं मी? आणि कसं? जीव धोक्यात होता की तो वाचला, हे लक्षात ठेवू की तो वाचवण्यासाठी झटलेल्या लोकांना लक्षात ठेवू? टोचलेल्या सुया, शरीरावर कापल्याचा खुणा, डायलिसीस घेताना झालेला त्रास लक्षात ठेवू की हे सारं करणारे लोक मला जो धीर देत होते आणि सांभाळून घेत होते ते लक्षात ठेवू? बिछान्यात निपचित पडलेलं माझं शरीर लक्षात ठेवु की न कंटाळता आणि चेहऱ्यावरचं हसू मावळू न देता ते स्वच्छ करणारी ती नर्स आणि मावशी लक्षात ठेवू? आयसीयुतून मला रुममध्ये नेताना एक नर्स जवळ आली आणि म्हणाली, "अभी अपना खयाल रखनेका और इधर कभी वापस नाही आनेका." मी हे वाक्य नाही विसरू शकत.
खूप त्रास झाला. पण त्या त्रासात जे अनुभवाला आलं ते त्याहीपेक्षा खूप मोठं आणि महत्वाचं होतं, असं मला वाटतं. मी आजाराच्या गांभीर्याने खचून गेलेले नाही; घाबरलेले नाही; उद्विग्नताहि मनात आली नाही. तसेच सारं काही संपल्यानंतर मी सुटकेचा श्वासही सोडलेला नाही आणि आनंद व्यक्त करण्याचीही उर्मी आलेली नाही. संवेदनाहीन झाले आहे, हे हि मला मान्य नाही. एक निश्चित प्रतिक्रिया माझ्यातून आलेली नाही. पण शांतता मात्र भरून राहिली आहे मनात. ती शब्दात व्यक्त करणे शक्य नाही. कदाचित आणखी काही दिवसांनी मला तेही शक्य होईल.
तू म्हणाला होतास की ब्लॉग लिहायला लागलीस कि पूर्ण बरी झालीस असं मी समजणार. म्हणून आज हा ब्लॉग फक्त तुझ्यासाठी.
वर्षाकाकू